नवी दिल्लीः आज रविवारी रेडिओवर ” (Mann Ki Baat) कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधत आहेत. देशातील करोनाचे वाढते संकट आणि लॉकडाऊन दरम्यान मोदींनी अनेकदा देशाला संबोधित केले आहे. काही दिवसांपूर्वीच २८ जूनला मोदींनी याआधी मन की बातद्वारे संबोधित केले. आता आज (रविवार) पुन्हा पंतप्रधान मोदी ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधत आहेत. ‘मन की बात’चा त्यांचा हा ६७वा एपिसोड आहे. पाहुया, काय म्हणत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी… ( is addressing the people of india in his )

Live अपडेट्स…

>> सूरिनाम (आफ्रिका खंड) देशाचे राष्ट्रपती चंद्रिकाप्रसाद संतोखी यांना दिल्या शुभेच्छा.. आपल्या पदाची शपथ घेताना चंद्रिकाप्रसाद संतोखी यांनी वेदमंत्रांनी घेतली शपथ- मोदी

>> तामिळनाडूतील नमक्कल येथील कनिका या विद्यार्थिनीशीही साधला मोदी यांनी संवाद.

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील उस्मान या विद्यार्थ्याशी साधला संवाद.

>> केरळमधील एर्नाकुलम येथील विनायक या विद्यार्थ्याशी साधला संवादय

>> परीक्षेत उत्तम कामगिरी केलेल्या पानीपतमधील कृतिका या विद्यार्थिनीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद.

>> आता देश बदलत आहे, छोटया गावांमधूनही तरुण पुढे येत आहेत. हे तरुण नाविण्यपूर्ण कामे करत आहेत- मोदी

>> देशात हातमागाची कामे देखील उत्तम होत आहेत- मोदी

>> लडाखमध्ये ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन केले जात आहे…. या शेतीमध्ये लडाखची अर्थव्यवस्था बदलण्याची शक्ती आहे-मोदी

>> लेह आणि लडाख तसेच कच्छ या दोन भागांमधील आर्थिक प्रगतीबाबत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले विचार

>> पंतप्रधान मोदी यांनी देशात होत असलेल्या नाविण्यपूर्ण पावलांवर केले भाष्य… ईशान्यकडील राज्यात बांबूपासून पाणी पिण्याचे ग्लास तयार केले जात आहेत- मोदी

>> करोना संकटाच्या या काळात अनेक प्रेरक गोष्टीही पुढे आल्या आहेत- मोदी

>> करोनाचा धोका टळलेला नाही, तो आजही तेवढाच घातक जेवढा तो सुरुवातीला होता- मोदी

>> कारगिलमधील भारताचे शौर्य संपूर्ण जगाने पाहिले आहे- पंतप्रधान मोदी

>> देशातील सर्वात गरीब, शेवटच्या व्यक्तीबाबत विचार करा हा महात्मा गांधी यांचा अटलबिहारी वाजपेयी यांनी व्यक्त केलेला विचार पंतप्रधानांनी आज बोलून दाखवला.

>> कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मरण

>> विनाकारण सर्वांशी शत्रुत्व घेणे हे दुष्टांचा स्वभाव असतो- मोदी

>> कारगिलला भेट देणे हा माझ्या जीवनातील अनमोल क्षण होता- मोदी

>> पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला होता- मोदी

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कारगिल युद्धात शहीद झालेल्या शूर जवानांचे स्मरण

>> त्याच प्रमाणे २८ जूनच्या मन की बातमध्ये मोदींनी करोनाचे संकट आणि भारत-चीन तणावावर भाष्य केले होते.

>> ३१ मे रोजी झालेल्या ‘मन की बात’ च्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी करोनापासून सुरक्षा करण्यासाठी कुठली काळजी घ्यावी, यावर सूचना केल्या होत्या.

>> ‘मन की बात’ च्या मागच्या दोन कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान मोदींनी करोनाच्या प्रादुर्भावावर जनतेशी संवाद साधला होता.

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे काही वेळातच जनतेशी संवाद साधत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

  2. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here