नवी दिल्ली: यांनी () या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले. कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी कारगिल विजय दिवसाचा संदर्भ देऊन जवानांच्या बलिदानाच्या स्मृती जागवल्या. या वेळी पंतप्रधानांनी पाकिस्तानला कडक शब्दांत सुनावले. याबरोबरच मोदींनी कोरोना विषाणू, स्वयंपूर्ण भारत, आसाम आणि बिहारचा पूर अशा मुद्द्यांचा देखील उल्लेख केला. लवकरच भारताचा स्वतंत्र्य दिन येत असून या दिनानिमित्त देशवासीयांनी कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

पाकिस्तानवर साधला निशाणा

कारगिल दिनी पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर निशाणा साधला. दुष्टांचा स्वभाव हा सर्वांशी शत्रूत्व राखणे असचा असतो. असे लोक आपले हीत करणाऱ्यांचे देखील नुकसान करत असतात. पाकिस्तानने भारताच्या पाठीत सूरा खुपसला होता. पाकिस्तानने भारताची जमीन ताब्यात घेण्यासाठी खूप प्रयत्न केल्याचेही मोदी म्हणाले.

कोरोनापासून मुक्ती मिळवण्याचा संकल्प करा: मोदी

१५ ऑगस्ट रोजी, म्हणजेच देशाच्या स्वातंत्र्यदिनी देशवासीयांनी कोरोनापासून स्वतंत्र होण्याचा संकल्प केला पाहिजे, असे आवाहन देशातील जनतेला केले. करोनाबाबत बोलताना मोदी म्हणाले की, आज आपल्या देशात करोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर चांगला आहे. देशातील कोरोनामुळे होणारे मृत्यूचे प्रमाणही बरेच कमी आहे. मात्र, करोनाचा धोका आजही कायम असून आपल्याला कोरोनाविरुद्ध गंभीरपणे लढावे लागेल, असेही मोदी म्हणाले. ज्या गोष्टी प्रतिकारशक्ती वाढवतात त्याचा अवलंब करा, आयुर्वेदिक काढे वगैरे घेत राहा. कोरोनाच्या या काळात आम्हाला इतर आजारांपासून मुक्त राहिले पाहिजे. या काळात रुग्णालयात जाण्याची गरज पडू नये, याची काळजी घ्यावी लागेल, असेही मोदी म्हणाले.

वाचा-

देश आसाम-बिहारच्या सोबत आहे: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये संवाद साधताना पुराचा उल्लेख केला. मोदी म्हणाले की कोरोनाच्या या संकटाच्या काळात आसाम आणि बिहारसाठी पूर हे नवीन आव्हान आहे. संपूर्ण देश या संकटात पीडित लोकांच्या पाठीशी उभा आहे, असेही मोदी म्हणाले.

वाचा:

सुरिनाम देशाता केला उल्लेख
या वेळी मोदींनी आफ्रिका खंडातील सूरीनाम देशाचा उल्लेख केला. शेकडो वर्षांपूर्वी भारतीय लोक तेथे गेले होते. आता एका चतुर्थांशपेक्षा जास्त भारतीय मूळ असलेले लोक त्या देशाचे नागरिक आहेत. भारतीय वंशाचे चंद्रिकाप्रसाद त्या देशाचे राष्ट्रपती आहेत. तेथील भाषा, ‘सरनामी’ ही एक सामान्य भाषा असून ती ‘भोजपुरी’ ची बोली आहे, असे मोदी म्हणाले. आपल्या राष्ट्रपतिपदाची शपथ घेताना चंद्रिकाप्रसाद यांनी वेदांमधील मंत्रांचे उच्चारण केले होते, असेही मोदी म्हणाले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here