बंगळुरू: पतंग उडवत असताना घडलेल्या दुर्घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला आहे. बंगळुरूच्या आरटी नगर परिसरात ही घटना घडली. १३ वर्षांचा अबुबकर घराजवळ असलेल्या उद्यानात पतंग उडवत होता. त्यावेळी त्याची पतंग विजेच्या तारांमध्ये अडकली आणि अबुबकरचा करुण अंत झाला.

विजेचा शॉक लागल्यानं अबुबकर ८० टक्के भाजला. ही घटना सोमवारी घडली. अबुबकरला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. मुलाच्या आईनं दिलेल्या तक्रारीनंतर आरटी नगर पोलिसांनी केपीटीसीएल, बेस्कॉम आणि बीबीएमपी अधिकाऱ्यांच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या ३०४ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तुझी का माझी? बॉयफ्रेंड, एक्स बॉयफ्रेंड एकत्रच घरी; दोघांना पाहताच तरुणीची विहिरीत उडी अन्…
बंगळुरूच्या आरटी नगरात वास्तव्यास असणारा अबुबकर इयत्ता सातवीत शिकत होता. १३ वर्षांचा अबुबकर त्याच्या ३ मित्रांसोबत घराजवळ असलेल्या उद्यानात पतंग उडवत होता. पतंग अचानक विजेच्या खांब्याला असलेल्या तारेत अडकली. पतंग काढण्यासाठी अबुबकर घराच्या छतावर चढला. पतंग काढण्यासाठी त्यानं मांजा हातात धरला. त्यावेळी त्याचा हात विजेच्या तारेला लागला. त्याला जोरदार शॉक लागला आणि तो गंभीररित्या भाजला.
स्वत:ला संपवण्याचा कट, कार पेटवली, बॉडी सापडली; एका बाटलीनं केस फिरली; कारण ठरले 6 कोटी
अबुबकर ८० टक्के भाजला होता. त्याला उपचारांसाठी तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रथमोपचारानंतर त्याला बॅपटिस्ट रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथून वाणी विलास रुग्णालयात पाठवण्यात आलं. मंगळवारी संध्याकाळी अबुबकरनं शेवटचा श्वास घेतला. या प्रकरणी पोलिसांनी कलम ३०४ अ अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप अबुबकरची आई सुल्ताना यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here