गणेश आणि रंजना यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. दोघांनी कुटुंबीयांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी ऐकलं नाही. दोन्ही कुटुंबाचा या नात्याला विरोध केला. त्यामुळे गणेश आणि रंजनानं एकत्रच जगाचा निरोप घेतला. यानंतर कुटुंबीयांचे डोळे उघडले. दोघांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी त्यांनी दोघांचं लग्न लावलं.
दोन्ही कुटुंबांनी एकत्र येऊन दोघांचे पुतळे तयार केले. आदिवासी परंपरेनुसार दोघांचं लग्न लावण्यात आलं. ‘गणेश आमच्या लांबच्या नात्यातला होता. त्यामुळे आम्ही लग्नाला विरोध केला. मात्र आता दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पुतळे करून त्यांचं लग्न लावलं आहे,’ असं रंजनाचे आजोबा भीमसिंह पडवी यांनी सांगितलं.
Home Maharashtra couple statue wedding, जिवंत असताना लग्नाला विरोध, दोघांनी जीव दिला; ६ महिन्यांनंतर...