मुंबईः राज्यात आज करोना संसर्गामुळं २६७ जणांचा मृत्यू झाला असून दिवसभरात ९ हजार ४३१ नवीन रुग्णांची नोंद आढळले. त्यामुळं एकूण करोनाबाधितांची संख्या ३ लाख ७५ हजार ७९९ इतकी झाली आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ()

राज्यात करोनाचा आकडा वाढत असताना आरोग्य प्रशासनाची मात्र झोप उडाली आहे. अद्याप राज्यातील मृत्यूदर कमी होऊ शकलेला नाहीये. गेल्या २४ तासांत राज्यात २६७ जणांनी जीव गमावला आहे तर एकूण मृतांची संख्या १३ हजार ६५६ इतकी झाली आहे. राज्यात सध्या ३.६३ टक्के इतका मृत्यूदर आहे.

वाचाः

राज्यात गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात करोना रुग्ण सापडत आहेत. आजही नऊ हजारांच्यावर करोनाबाधित रुग्णांची नोंद झआली आहे. या रुग्णांना राज्यातील विविध कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी करोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे. आज राज्यात तब्बल ६ हजार ०४४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण २ लाख १३ हजार २३८ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर एक टक्क्यानं वाढ होऊन ५६. ७४ इतका झाला आहे.

वाचाः

राज्यात आता एकूण १ लाख ४८ हजार ६०१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १८ लाख ८६ हजार २९६ चाचण्यांपैकी ३ लाख ७५ हजार ७९९ (१९.९२) टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर बाकिचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसंच, सध्या राज्यात ९ लाख ०८ हजार ४२० व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून ४४ हजार २७६ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here