ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण आणि धनजंय मुंडे यांना करोनाची लागण झाली होती. त्यातून बरे होऊन हे तिन्ही मंत्री पुन्हा कामाला लागले आहेत. तर, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांनाही करोनाची लागण झाल्यानं होम क्वारंटाइन झालेले आहेत. उदगीर मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांना मागील काही दिवसांपासून ताप आणि अंगदुखीमुळं त्यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यामुळं त्यांनी करोना चाचणी करुन घेतली व तीचा अहवाल पॉझिटिव्ह आली आहे. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात काही दिवसांपूर्वी सर्वाधिक रुग्ण आढळले होते. त्या दरम्यान बनसोडे सतत मतदारसंघात फिरत होते. तसंच, सततच्या संपर्कामुळ त्यांना करोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. करोनाचा काळात सतत नागरिकांच्या मदतीसाठी प्रत्यक्षात मैदानात उतरले होते.
दरम्यान, राज्यात करोनाचा वाढता कहर सुरुच आहे. आज तब्बल नऊ हजारांच्यावर करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. या रुग्णांना राज्यातील विविध कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी करोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे. आज राज्यात तब्बल ६ हजार ०४४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण २ लाख १३ हजार २३८ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर एक टक्क्यानं वाढ होऊन ५६. ७४ इतका झाला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times