लखनऊ: उत्तर प्रदेशच्या शाहजहापूरमध्ये रहस्यमयी आजारामुळे एका कुटुंबाची बिकट अवस्था झाली आहे. कुटुंबातील सर्वच्या सर्व ८ सदस्यांची त्वचा काळवंडली असून सर्व सदस्यांची बोटं वाकडी झाली आहेत. यानंतर आरोग्य विभागाची झोप उडाली. संपूर्ण कुटुंबाला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे. कुटुंबातील एका मुलीचा आजारामुळे मृत्यू झाला आहे.

कुटुंबाला त्वचेचा आजार आहे. त्यांच्या हातांची बोटं वाकडी झाली असून आतल्या बाजूस दुमडली गेली असल्याचं वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितलं. हा आजार नेमका कोणता आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही. त्यासाठी चाचण्या केल्या जात आहेत. हा आजार नेमका कोणता आहे त्याचा शोध घेतला जात आहे.
बायकोला माहेरी सोडून नवरा घरी परतला; पोटदुखीमुळे रुग्णालय गाठलं; एक्सरे पाहून डॉक्टर हैराण
घटना बडागाव येथील आहे. या ठिकाणी ५० वर्षीय सियाराम त्यांच्या कुटुंबासोबत राहतात. सहा महिन्यांपूर्वी घरातील एका सदस्याच्या शरीराला खाज सुटली. त्यानंतर त्याची त्वचा काळवंडली. त्यांनी सुरुवातीला गावातील वैद्याकडेच उपचार केले. मात्र गुण न आल्यानं शाहजहापूरमधील खासगी डॉक्टरकडे उपचार सुरू केले. मात्र त्वचेचा काळा रंग गडद होत गेला. कुटुंबातील सर्वच्या सर्व ८ जणांना हाच त्रास होऊ लागला. एका मुलीचा मृत्यूही झाला.
तुझी का माझी? बॉयफ्रेंड, एक्स बॉयफ्रेंड एकत्रच घरी; दोघांना पाहताच तरुणीची विहिरीत उडी अन्…
कुटुंबाला रहस्यमयी आजार झाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर डॉक्टरांचं एक पथक कुटुंबाच्या घरी पोहोचलं. संपूर्ण कुटुंबाला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं. हा त्वचेशी संबंधित आजार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हा आजार कुटुंबाला कसा झाला याबद्दल अद्याप तरी डॉक्टरांकडे कोणतीही माहिती नाही. सध्या या आजाराचा अभ्यास सुरू आहे. त्यानंतर उपचाराची योग्य पद्धत समजू शकेल, असं डॉक्टर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here