मेरठः उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात काही मुस्लिम महिलांनी रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर प्रभू रामचंद्रांसाठी राख्या बनवल्या आहेत. मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या सहकार्यातून या राख्या राम मंदिर ट्रस्टला पाठवण्यात आल्या आहेत. हिंदू-मुस्लिम सामाजिक सौहार्दाचे हा उत्तम आदर्श मुस्लिम राष्ट्रीय मंचाने देशासमोर ठेवला आहे. मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या महिला संयोजिका अॅड. शाहीन परवेज यांची ही कल्पना आहे. रेश्मा, नीलम, शबनम, फरहीन आणि फरजाना यांच्या साथीने आपण या राख्या रामललासाठी बनवल्या आहेत. या राख्या ३ ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी अयोध्येत रामललाच्या हातावर बांधाव्यात असं आवाहन त्यांनी केलंय.

जातीधर्माच्या नावाने सामाजिक सौहार्द बिघडवणाऱ्यांवर शाहीन परवेज यांनी सडकून टीका केली. भारतात राहणारे मुस्लिम हे मुघल किंवा बाबरचे वंशज नाहीए. तर प्रत्येक भारतीय मुस्लिमाच्या मनात प्रभू श्रीरामचंद्र आहेत. अयोध्येतील राम मंदिर निर्माणात मुस्लिमांचीही मोठी भूमिका आहे. जात, धर्म आणि भेदभावांच्या पलिकडे जाऊन मुस्लिमांनीही अयोध्येत राम मंदिर बनवण्यासाठी सहकार्य केलं आहे, असं त्या म्हणाल्या.

‘प्रभू श्रीराम हे इमाम ए हिंद आहेत’

प्रभू श्रीराम हे ‘इमाम ए हिंद’ आहेत. भारताची ओळख त्यांच्यामुळेच आहे. ५ ऑगस्टला राम मंदिराचे भूमिपूजन होत असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. आपण सुरुवातीपासूनच अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या बाजून आहोत. राम मंदिर निर्माणासाठी राम मंदिर ट्रस्ट आपल्या शुभेच्छा आहेत. तसंच पंतप्रधान मोदी हे भूमिपूजनाच्या सोहळ्याला येणार असल्याने त्यांचेही अभिनंदन, शाहीन परवेज यांनी केलं.

राखीवर ‘जय श्रीराम’ लिहून श्रद्धा व्यक्त

मुस्लिम महिलांनी रामललासाठी बनवलेल्या राख्या या अतिशय मनमोहक आहेत. भगवान श्रीकृष्णांची प्रतिकृती आणि मोरपंखांनी सुशोभित असलेल्या या राख्यांवर मुस्लिम महिलांनी ‘जय श्रीराम’ लिहित आपली श्रद्धाही व्यक्त केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here