नवी दिल्लीः देशात संसर्ग झालेल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या १४ लाखांवर गेली आहे. कोरोना व्हायरसने देशात आतापर्यंत १४,११,९५४ जणांना संसर्ग झाला आहे, अशी रविवारची ही आकडेवारी आहे. covid19india.org ने ही आकडेवारी दिली. या आकडेवारीनुसार कोरोनाचे देशात ४ लाख ७७ हजार २२८ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर ९, ०१,९५९ जण करोनामु्क्त झाले आहेत. बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोनामुळे देशात आतापर्यंत ३२ हजार ३५० नागरिकांचा बळी गेला आहे.

देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात रविवारी करोनामुक्त झालेल्या ६०४४ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत एकूण २,१३,२३८ कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे ५६.७४ टक्के इतके आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ९४३१ नवीन रुग्ण आढळले. तर या काळात २६७ रुग्णांचा मृत्यू झाला.

तामिळनाडूमध्ये रविवारी कोरोनाची ६९८६ नवीन आढळले. यानुसार राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या संख्याही २,१३,७२३ वर पोहोचली आहे. तामिळनाडूमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत ३४९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात ५३,७०३ कोरोनाचे अ‍ॅक्टिव रुग्ण आहेत. तर १,५६,५२६ जण करोनामुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

दिल्लीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.९५ टक्के

दिल्लीत आतापर्यंत १,३०,६०६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. राजधानी दिल्लीत सध्या ११,९०४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर १,१४,८७५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. दिल्लीत कोरोनामुळे ३८२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे ८७.९५ टक्के आहे, ही दिलासा देणारी बाब आहे.

मध्य प्रदेशात गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूची ७१६ नवीन रुग्ण आढळले. यासह मध्य प्रदेशात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ही २६,९२६ वर गेली आहे. राज्यात, गेल्या २४ तासांत या आजारामुळे आणखी ८ जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा अलिकडच्या काळात सर्वाधिक आहे. यासह राज्यातील कोरोना येथील मृतांची संख्या वाढून ७९९ इतकी झाली आहे.

तेलंगणामध्ये आज कोरोनाचे १,५९३ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. राज्यातील एकूण रुग्णांची संख्याही वाढून ५४ हजार ५९ इतकी झाली आहे. या करोनामुळे आणखी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील करोनाने मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्याही ४६३ इतकी झाली आहे.

आंध्र प्रदेशात गेल्या चोवीस तासांत कोरोनाच्या ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोना मृत्यू झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ही १ हजारांवर गेलीय. राज्यात एकूण १०४१ जणांना करोनाने बळी घेतला आहे. आंध्र प्रदेशात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे ७६२७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या वाढून ९६,२९८ इतकी झाली आहे. राज्यात ४६,३०१ रुग्ण बरे झाले आहेत. तर ४८,९५६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here