आई झाल्यानंतर महिला कर्मचाऱ्यांना ३६५ दिवसांची रजा मिळेल. तर वडील झालेल्या कर्मचाऱ्याला ३० दिवसांची सुट्टी मिळेल. एखाद्या दाम्पत्याला मुलं होत नसल्यास आयव्हीएफ प्रक्रियेसाठी सरकार अर्थसहाय्य करणार आहे. मुख्यमंत्री तमांग यांनी एका कार्यक्रमात याबद्दलची माहिती दिली. सरकारनं ४० आणि त्यापेक्षा अधिक वर्षांच्या महिलांच्या भरतीचा प्रस्ताव दिला आहे. महिला कर्मचारी बाळंत झाल्यानंतर त्यांची बाळांची काळजी घेण्याचं काम या महिलांकडे असेल. सरकार त्यांना यासाठी महिन्याकाठी १० हजार रुपये देईल.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार सिक्किममधील प्रजननाचा दर देशात सर्वात कमी आहे. सिक्किमचा प्रजनन दर १.१ आहे. याचा अर्थ सिक्किममधील महिला सरासरी एक मूल जन्माला घालतात. शहरी भागात हेच प्रमाण ०.७, तर ग्रामीण भागात १.३ आहे. राज्य सरकारच्या दृष्टीनं हा चिंतेचा विषय आहे.
Home Maharashtra fertility rate, दुप्पट पगारवाढ, वर्षभर सुट्टी; लोकसंख्या वाढीसाठी ‘या’ राज्य सरकारकडून मोठ्या...