बीड: ऊसतोड कामगार म्हटलं की समोर दिसतो तो उसाचा फड आणि उसाचा कारखाना. ऊस तोडणीला जाणाऱ्या कामगारांचे काम पाहिलं तर भल्याभल्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत ऊसतोड कामगारांच्या अनेक समस्या पाहायला मिळाल्या आहेत. या ऊसतोड कामगारांना ऊस तोडणी मधून वेळच मिळत नाही. मात्र या सगळ्याला अपवाद ठरलंय बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील सोनाखोटा गावातील हजारे कुटुंब.

गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून ऊस तोडणीला जाणारं हजारे कुटुंब आज अचानक महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालंय. त्यामागचं कारणही तसंच आहे. अशोक हजारे आणि त्यांच्या पत्नी मनिषा हजारे यांना इन्स्टाग्रामचा छंद जडला. आपल्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित व्हिडीओ ते इन्स्टावर अपलोड करू लागले. मात्र यामध्ये सरस ठरला दोघे ऊस घेऊन कारखान्यावर बैलगाडीतून जात असलेल्या दोघांचा व्हिडीओ. त्यामुळे हजारे दाम्पत्य रातोरात स्टार झालं. सोशल मीडियात या व्हिडीओनं हवा केली.
पॉर्न बघून वृद्ध महिलांना हेरायचा; अत्याचार करून संपवायचा; व्हिडीओमुळेच सायकोचा खेळ खल्लास
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात असलेलं सोमनाथ गावचे रहिवासी असलेलं हजारे दाम्पत्य सध्या ऊस तोडणीसाठी कर्नाटकात असलेल्या बाळासाहेब शिवशक्ती साखर कारखान्यात ऊस तोडणीचं काम करतं. ऊस तोडणीसारख्या मेहनतीच्या कामातून विरंगुळा म्हणून त्यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करण्यास सुरुवात केली. आपल्या दैनंदिन आयुष्यातील क्षण त्यांनी इन्स्टावर शेअर केले.

बैलगाडीतून ऊस घेऊन जाणाऱ्या हजारे दाम्पत्याचा व्हिडीओ इन्स्टावर गाजला. तो तुफान व्हायरल झाला. आयुष्याच्या प्रत्येक क्षणात आनंद शोधता आला पाहिजे. ज्याला ही कला जमली, त्याला आयुष्यातला आनंद समजला. त्याला आयुष्य समजलं, अशा आशयासह अनेकांनी हजारे दाम्पत्याचा व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडला. आयुष्य जगण्याची कला अगवत झालेलं दाम्पत्य अशा शब्दांत अनेकांनी दोघांचं कौतुक केलं.
VIDEO: बारिश कर दू पैसे की… तरुणानं पुलावरून पाडला पैशांचा पाऊस; नोटा उचलायला तोबा गर्दी
आयुष्य कितीही परीक्षा घेत असो, काळ कितीही संकटाचा असो परिस्थितीचा आनंद घ्यायला शिका, असा संदेश अनेकांना हजारे दाम्पत्याच्या व्हिडीओतून मिळाला. ऊस तोडणी करणारे हजारे सहा सहा महिने घरापासून दूर असतात. ज्या ठिकाणी आपलं कोणीही नाही, त्या ठिकाणी ऊस तोडणी राहतात. हातातोंडाची गाठ पडावी यासाठी त्यांचा संघर्ष सुरू असतो. मात्र परिस्थिती कितीही कसोटी पाहत असली तरी हजारे दाम्पत्य हसणं विसरलेलं नाही. संकटाच्या, संघर्षाच्या काळात आनंदी, समाधानी राहण्याची कला त्यांना जमली आहे.

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here