‘दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि कोलकाता ही देशाची आर्थिक उलाढालींची प्रमुख केंद्रे आहेत. या महानगरांमध्ये देशातील लाखो तरुण आपले करियर, त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी येतात. आता या तीनही ठिकाणी चाचण्यांची उपलब्ध क्षमतेत आणखी १० हजार चाचण्यांची क्षमता जोडली जाणार आहे.
इतर आजारांसाठीही उपयोगी ठरणार
‘हायटेक लॅबमुळे आता या शहरांमध्ये अधिक चाचणी करता येतील. या हायटेक लॅब फक्त कोरोनापुरत्या मर्यादीत मर्यादीत नसून हेपेटायटीस बी, हिपॅटायटीस सी, एचआयव्ही आणि डेंग्यू यासारख्या इतर आजारांसाठीही उपलब्ध असतील. आज करोनासाठी ज्या हायटेक लॅबचे उद्घाटन झाले आहे, त्यामुळे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालला मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘योग्य वेळी योग्य निर्णयाचे परिणाम चांगले’
करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात योग्य वेळी योग्य निर्णय घेतलेल गेल्याने इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती अधिक चांगची आहे. देशात कोरोनाने होणारे मृत्युही कमी आहेत. तसंच रुग्णांचे बरे होण्याची प्रमाणही इतर देशांच्या तुलनेत खूपच जास्त आहे आणि दिवसेंदिवस त्यात सुधारणा होत आहे. भारतात कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या ही १० लाखांजवळ पोहोचली आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी या लॅब सुरू केल्याबद्दल आयसीएमआर आणि अन्य संस्थांच्या तज्ञांचे अभिनंदन केले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Thanks so much for the blog post.
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
These are actually great ideas in concerning blogging.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.