कोल्हापूर: राम जन्मभूमी बाबत काहीही न करता आम्हीच सर्व केले, हा दावा अनेकजण करत आहेत, असा टीकेचा बाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी शिवसेनेवर मारला. मुख्यमंत्री यांना हिंदुत्वापेक्षा सध्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची महत्त्वाची वाटत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. ( Targets )

वाचा:

भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, येत्या पाच ऑगस्टला अयोध्या येथे भूमीपूजनाचा समारंभ पंतप्रधान यांच्या हस्ते होत आहे. अनेक वर्षे ज्या क्षणाची रामभक्त वाट पाहात होते, तो क्षण आता आला आहे. तीन कोटी जनता तेथे प्रत्यक्ष या स्वप्नपूर्तीचा आनंद घेणार होती. पण करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा समारंभ भव्य दिव्य करता येत नाही. हा सोहळा ऑनलाइन पद्धतीने व्हावा, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावर विश्व हिंदू परिषदेने टीका केली. तीन कोटी नाही पण किमान तीनशे लोकांनी तेथे प्रत्यक्ष उपस्थित राहून हा समारंभ करण्याचे नियोजन केले आहे.

वाचा:

राम मंदिराच्या भूमीपूजनाचे निमंत्रण मुख्यमंत्री ठाकरे यांना देण्यात आले आहे, यामुळे त्यांची अडचण झाल्याचे सांगताना पाटील म्हणाले, या कार्यक्रमाला आम्हाला निमंत्रणाची गरज नाही, असे शिवसेनेचे खासदार म्हणत होते. आता मात्र निमंत्रण दिल्यानंतर कार्यक्रमाला जायचे की नाही या पेचात मुख्यमंत्री अडकले आहेत. कारण त्यांना आता हिंदुत्वापेक्षा मुख्यमंत्रिपदाची खुर्ची महत्वाची वाटत आहे. ही खुर्ची टिकवायची असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दुखावणे परवडणार नाही, असे त्यांना वाटत असावे.

वाचा:

मराठा समाजाच्या मुलांची झोप उडाली

मराठा आरक्षण सुनावणीवरून सरकारवर टीका करताना पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आजच्या सुनावणीनंतर या खटल्याचा निकाल जाहीर होईल अशी अपेक्षा होती. मात्र सरकारकडून पुरेशी कागदपत्रे मिळाली नाहीत, त्यामुळे बाजू मांडण्यासाठी आणखी मुदत द्या, अशी विनंती सरकारच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली. याचा अर्थ असा होतो की, सरकारने या वकिलांना पुरेशी कागदपत्रेच दिली नाहीत. ही जर वस्तुस्थिती असेल तर इतके दिवस आमची पूर्ण तयारी झाल्याचे सरकार खोटे सांगत होते हे स्पष्ट होते. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात अंतिम निकाल लागत नाही, तो पर्यंत मराठा आरक्षण गृहीत धरून नोकर भरती करता करता येणार नाही असे स्पष्ट करून यामुळे मराठा समाजाच्या मुलांची मात्र झोप उडाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here