औरंगाबाद : घराबाहेर खेळत असताना विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना २६ जानेवारी रोजी संध्याकाळी हर्सूल परिसरातील फातेमानगर येथे घडली. शेख नाजिम शेख वसीम (रा.फातेमानगर, हर्सूल परिसर ) असं मृत मुलाचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, नाजिमचे वडील शहरातील एका ट्रॅक्टर कंपनीत हेल्पर म्हणून कामाला आहेत, तर आई गृहिणी आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संध्याकाळी नाजिम घराबाहेरील पटांगणात खेळत होता. तर आई-वडील घरात होते. दरम्यान खेळताना घरासमोरील विद्युत खांबाला नाजिमचा स्पर्श झाला. विजेचा धक्का बसल्याने तो निपचित जमिनीवर पडला. हा प्रकार शेजाऱ्यांनी पहिला आणि आरडाओरड केली. त्यानंतर नाजिमच्या आई-वडिलांनीही घराबाहेर धाव घेतली.

पुणेकर तरुणाचा प्रताप, स्वतःच्याच बंगल्याला अन् गाडीला आग लावली; नंतर तमाशाला जाऊन बसला

बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या नाजिमला तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.

दरम्यान, चिमुकल्याचा अशा पद्धतीने दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here