मुंबई: राज्यात संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत असताना करोनाच्या आजच्या आकडेवारीतून मोठा दिलासा देणारी बातमी पुढे आली आहे. राज्यात आज तब्बल ८७०६ रुग्णांनी करोनावर मात केली असून तुलनेत दिवसभरात दाखल झालेल्या नवीन रुग्णांचा आकडा कमी म्हणजे ७९२४ इतका आहे. हे आकडे करोना आटोक्यात आणण्याच्या दिशेने महाराष्ट्राचा प्रवास सुरू झाल्याचे संकेत देणारे ठरले आहेत. ( )

वाचा:

राज्यात आतापर्यंत १९ लाख २५ हजार ३९९ जणांची करोना चाचणी घेण्यात आली असून त्यातील ३ लाख ८३ हजार ७२३ जणांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे प्रमाण १९.९२ टक्के इतके आहे. गेल्या २४ तासांचा विचार केल्यास राज्यासाठी खूपच दिलासा देणारे आकडे समोर आले आहेत. गेल्या २४ तासांत पुन्हा एकदा करोनामुक्त रुग्णांचा आकडा ८ हजार पार गेल्याचे पाहायला मिळाले. आज एकूण ८ हजार ७०६ रुग्णांनी करोनावर मात केली व त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामुळेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही () वाढून ५७.८४ टक्के इतके झाले आहे. आतापर्यंत २ लाख २१ हजार ९४४ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. दुसरीकडे आज करोना बाधित नवीन रुग्णांचा आकडा कमी राहिला. २४ तासांत ७९२४ नवीन रुग्णांचे निदान झाले.

वाचा:

राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ३ लाख ८३ हजार ७२३ इतकी असली तरी त्यातील अॅक्टिव्ह म्हणजेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ४७ हजार ५९२ इतकी आहे. त्यात जिल्ह्यात सर्वाधिक ४८ हजार ६७२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३४ हजार ४७१ इतकी आहे. पालिका हद्दीत अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा कमी होत चालला असून सध्या २१ हजार ८१२ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. करोनाच्या विळख्यात सापडलेल्या मुंबईसाठी हे चांगले संकेत मानले जात आहेत.

आणखी २२७ रुग्ण दगावले

राज्यात गेल्या २४ तासांत करोनाने आणखी २२७ रुग्ण दगावले असून मृतांचा एकूण आकडा १३ हजार ८८३ इतका झाला आहे. सर्वाधिक ६१३२ करोनामृत्यू मुंबईत झाले आहेत. त्यापाठोपाठ ठाण्यात करोनाने २३८६ तर पुण्यात १८३८ जण आतापर्यंत दगावले आहेत. त्यामुळे मृत्यूदराबाबतची चिंता कायम आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here