कोल्हापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अतिशय चांगलं काम करत आहेत, वाढदिवसादिनी त्यांच्या संयमी व सुसंस्कृत आणि प्रांजळ स्वभावाचं कौतुक व्हायला हवं होतं. ते न करता त्यांच्यावर तोंडसुख घेण्यासाठी भाजपने कार्यकारिणीची बैठक बोलावली. त्यांच्या कामाचे कौतुक राहू द्या; किमान अपशकुन तरी करू नका, असा सल्ला ग्रामविकास मंत्री यांनी भाजपला दिला. ( Slams And BJP )

वाचा:

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेच जगातील २१० हून अधिक राष्ट्रांसह भारतातही करोना महामारीचा संसर्ग सुरू झाला . अशा परिस्थितीत प्रशासनाचा कोणताही अनुभव पाठीशी नसताना, एवढ्या कमी वेळेत करोना सारख्या या जागतिक महामारीवर राज्यात विजय दृष्टिक्षेपात आणला गेला आहे. त्यामुळेच खरंतर आजच्या वाढदिनी संयमी व सुसंस्कृत आणि प्रांजळ स्वभावाचं कौतुक व्हायला हवं होतं. परंतु; ते राहिलं बाजूलाच. त्यांच्यावर तोंडसुख घेऊन त्यांना अपशकुन घडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ही कार्यकारिणीची बैठक बोलावली. त्यांच्या या घाणेरड्या प्रयत्नाबद्दल आम्ही निषेधच व्यक्त करीत आहोत.’

वाचा:

फडणवीसांना मुश्रीफांचा खोचक सल्ला

मुश्रीफ म्हणाले, आज मुख्यमंत्री ठाकरे यांचा वाढदिवस. आजच भारतीय जनता पक्षाने कार्यकारिणी बैठक बोलावली होती. या बैठकीतील विरोधी पक्षनेते यांचे भाषण दूरचित्रवाणीवर लाइव्ह ऐकले. संपूर्ण राज्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करीत असताना मात्र त्यांना अपशकुन करीत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तर सातत्याने म्हणतात, महाराष्ट्रातील सरकार आम्ही पडणार नाही. महाविकास आघाडीतील पक्षांच्या अंतर्गत विरोधामुळे सरकार पडेल, असाही दावा करतात. तर मग फडणवीसांना माझा सल्ला आहे, की शांत राहून आमच्यातील अंतर्गत विरोधामुळे सरकार पडायची तर वाट बघा. किमान एवढा तरी शहाणपणा शिल्लक ठेवा की! असा फटकाही मुश्रीफ यांनी लगावला.

वाचा:

काय म्हणाले फडणवीस?

आम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेलो नाही. आम्ही संघर्षातून पुढं आलो आहोत. जमिनीवर राजकारण करणारे लोक आहोत. आमचा डीएनए संघर्षाचा आहे, असा अप्रत्यक्ष टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र भाजपच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हाणला. करोनाच्या लढ्यात राज्यातील रिक्षा सरकार पुरतं अपयशी ठरलंय. पण त्याकडं लोकांचं लक्ष जाऊ नये म्हणून आमच्यावर सरकार पाडण्याचा आरोप केला जात आहे. रोज तेच तुणतुणं लावलं जातंय. सरकार पाडून दाखवा असं आव्हान दिलं जातंय. स्वत:च मारायचं आणि स्वत:च रडायचं यातला हा प्रकार आहे. पण आम्हाला सरकार पाडण्यात अजिबात रस नाही. आम्ही ते पाडणार नाही. तुम्ही सरकार चालवून दाखवा, असं आव्हान फडणवीस यांनी महाविकास आघाडीला दिलं.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

  2. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

  3. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here