बस्ती: उत्तर प्रदेशच्या बस्तीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या त्याच्या कारबद्दल आश्चर्यकारक माहिती समजली. विशेष म्हणजे कार घेतल्यानंतर तब्बल ८ वर्षांनी त्यांना कारच्या नंबर प्लेटबद्दल चकित करणारी माहिती मिळाली. विशेष म्हणजे आरटीओ आणि वाहतूक विभागालादेखील याची कल्पना नव्हती. या दरम्यान कार मालकानं अनेकदा कारच्या विम्याचं नुतनीकरण केलं. रस्ते अपघात झाल्यानंतर विमा कंपनीनंदेखील क्लेमची रक्कम दिली.

आपल्या कारची नंबरप्लेट बोगस असल्याचं तब्बल आठ वर्षांनी कार मालकाला समजलं. त्यानंतर त्यानं कार मालकानं शोरुमचा मालक, तत्कालीन एआरटीओ आणि लिपिकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे त्यावेळी एआरटीओ असलेले शंकर सिंह सध्या बांदा जिल्ह्यात कार्यरत असून तत्कालीन लिपिक बाबू शिवानंद निवृत्त झाला आहे.
पत्नी खूप चांगली, माझ्यातच उणीव, तिच्या लायकीचा नाही; कुटुंबाला संपवत डॉक्टरनं जीव दिला
सप्टेंबर २०२२ मध्ये कार मालकानं हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी अर्ज केला. अर्ज आरटीओ विभागात पोहोचल्यानंतर आश्चर्यकारक माहिती समोर आली. तुमच्या कारची नंबर प्लेट बोगस असल्याचं कार मालकाला आरटीओकडून सांगण्यात आलं. याचा अर्थ आठ वर्षे कार मालक बोगस कागदपत्रांच्या आधारे कार चालवत होता. विशेष म्हणजे याचा सुगावा कोणालाच लागला नाही.
अक्षयला झोपायला घरी बोलव! नवऱ्याने बायकोला सांगितले; प्रियकर येताच संपवले; २० तुकडे केले
कार मालकाचं नाव मनिष मिश्रा आहे. त्यांनी २०१४ मध्ये गोरखपूरच्या कार शोरुममधून कार खरेदी केली. त्यांनी नोंदणी शुक्ल जमा केलं. मात्र त्यांना बोगस आरसी पेपर देण्यात आले. आपल्याला देण्यात आलेल्या नोंदणी कागदपत्रांवर UP 51 AA 6262 क्रमांक होता. शोरुम मालकानं दिलेली कागदपत्रं खरी असावीत असा त्यांचा समज होता. मात्र त्यांची फसवणूक झाली होती. त्यांना देण्यात आलेल्या क्रमांकाची नोंदणीच आरटीओमध्ये झालेली नव्हती. मात्र याच नंबर प्लेटची कार मिश्रा गेल्या ८ वर्षांपासून चालवत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here