औरंगाबाद: माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या असल्याचे राज्यमंत्री व शिवसेना आमदार यांनी सांगत राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावले. मी सर्व प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भेटल्यानंतर देणार असल्याचे सत्तार यांनी स्पष्ट केले. आज रात्री उशिरा सत्तार हे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज असल्यामुळे अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त होते. सत्तार यांच्या नाराजी नाट्याचा फटका शिवसेनेला आज औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बसला. जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पराभवाचा धक्का बसला. जवळपास नऊ तासांनंतर अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधला. मी सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे. मात्र, त्याआधी मी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्व माहिती देणार असल्याचे सांगत माझ्यावर मातोश्रीचा कंट्रोल असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडण्यात आल्या आहेत. ज्यांनी ह्या बातम्या दिल्या त्यांनाच विचारा की मी राजीनामा दिला की, असेही सत्तार यांनी म्हटले. आज रात्री मुंबईत जाणार असून उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here