मुंबईः मुंबईत जमिनीला आलेला सोन्याचा भाव, बिल्डरांनी वाढवलेल्या घरांच्या किमती यामुळं सर्वसामान्य मुंबईकरांचे हक्काच्या घराचे स्वप्न धूसर होत असतानाच मुंबईकरांसाठी ठाकरे सरकारनं नवी योजना आणली आहे. मुंबईत पहिल्यांदाच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गंत गृहनिर्माण योजना तयार करण्यात येणार आहे. यात ३० लाखांमध्ये घरं खरेदी करण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे.

या गृहनिर्माण योजनेचं भूमिपूजन ऑक्टोबर किंना नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. जर केंद्र सरकारने वेळेत या योजनेला परवानगी दिली, तर गोरेगावात मुंबईकरांना फक्त ३० लाखांत घर खरेदी करता येणार आहे. केंद्र सरकार ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या बैठकीत या योजनेला मान्यता देण्याची शक्यता आहे. अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. ही जागा खासगी मालकीची आहे आणि तो इको सेन्सेटिव्ह झोन आहे. त्यामुळं मागील बैठकीत सर्व माहिती उपलब्ध नसल्यानं ही बैठक पुढे ढकलण्यात आला असल्याचं म्हाडाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

वाचाः

या योजनेअंतर्गंत १५ हजार घरं ३ वर्षात उपलब्ध होणार आहेत. तसंच, सर्वसामान्य नागरिकांसाठी ही योजना असणार आहे. ३०० चौरस फुट घराची जागा असणार आहे. अशी माहिती म्हाडाचे अधिकारी मिलिंद म्हैसेकर यांनी दिली. घर बांधणीसाठी बिल्डरला फ्लोर स्पेस इंडेक्सला २.५मध्ये परवानगी दिली जाईल. यात ५० टक्के भाग हा १५०० EWS युनिटमध्ये प्रकल्पाला असणार. तर उर्वरित रक्कम खुल्या बाजारात विक्रीसाठी असणार आहे. सरकारने या योजनेस परवानगी दिल्यास ५०-५० अशी सार्वजनिक- खासगी भागीदारी होऊ शकणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या योजनेची घोषणा केली आहे. तसं ट्विटही त्यांनी केलं होतं.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

  2. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here