मुंबई: सांगलीतील ४०० वर्षे जुना वाचवण्यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री यांनी जी धडपड केली त्यावर बोट ठेवत भाजप नेते व आमदार यांनी आदित्य यांना खरमरीत सवाल विचारला आहे. ( Targets )

मुंबईत पायाभूत सुविधांच्या विविध प्रकल्पांड येणाऱ्या झाडांची पालिकेकडून कत्तल केली जात आहे. त्यावर बोट ठेवत शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. शेलार यांनी याबाबत एक ट्विट केलं असून ते फारच झोंबणारं आहे.

वाचा:

‘चारशे वर्षे जुना एक वटवृक्ष वाचवून युवा नेत्यांनी केवढं कौतुक करुन घेतलं! पण मुंबईत काय सुरु आहे?’, असा सवाल शेलार यांनी आदित्य यांचां नामोल्लेख टाळत केला आहे. लॉकडाऊन काळात १२८२ झाडांची झाडांची कत्तल करण्याचे प्रस्ताव मंजूर झाले असून आता अजून ६३२ झाडे तोडणे किंवा प्रत्यारोपण करण्याचा प्रस्ताव तयार, असल्याचा दावा करत सुरु आहे, असा गंभीर आरोप शेलार यांनी केला आहे. शेलार यांच्या या आरोपानंतर व भाजपमध्ये वादाची नवी ठिणगी पडणार हे निश्चित आहे.

आदित्य यांच्या प्रयत्नाने वाचला सांगलीतील ४०० वर्षे जुना वटवृक्ष

रत्नागिरी ते नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या मार्गावर मिरज ते पंढरपूर दरम्यान असलेल्या भोसे गावच्या हद्दीत महामार्गालगत गट नंबर ४३६ मध्ये सुमारे ४०० वर्षांपूर्वीचा विशालकाय वटवृक्ष उभा आहे. जवळच यल्लम्मा देवीचे पुरातन मंदिरही आहे. परिसरातील शेकडो पक्ष्यांचे हे हक्काचे नैसर्गिक आश्रयस्थान आहे. अनेक वाटसरू रोज याच्या सावलीत काही काळ विसावा घेऊन मार्गस्थ होतात. मिरजमार्गे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पालख्या याच वटवृक्षाच्या छायेत थांबतात. शेकडो वर्षांपासून हा वटवृक्ष परिसराची वेगळी ओळख बनला आहे. मात्र, महामार्गाच्या चौपदरीकरणात सर्व्हिस रोडमध्ये अडथळा ठरत असल्याने हा तोडण्याचा निर्णय महामार्ग प्राधिकरणने घेतला होता. भोसे ग्रामपंचायत, यल्लम्मा मंदिर देवस्थान ट्रस्ट, सह्याद्री देवराई निसर्गप्रेमी परिवारासह परिसरातील नागरिकांनी या निर्णयाला विरोध केला होता. ४०० वर्षांपूर्वीचा वटवृक्ष वाचवून त्याच्या बाजूने महामार्ग तयार करावा, या मागणीसाठी त्यांनी आंदोलन सुरू केले होते. याची दखल घेऊन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना वटवृक्ष वाचवण्याबाबत पत्र पाठवले होते. खासदार संजय पाटील यांनीही वटवृक्षाबद्दल असलेली जनभावना मंत्री गडकरींना कळवली. गडकरींनी तातडीने याची दखल घेऊन वटवृक्षाची पाहणी करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना पाठवले. यानुसार प्राधिकरणचे संचालक संजय कदम यांनी परिसरातील नागरिकांसह वटवृक्ष आणि महामार्गाच्या कामाची पाहणी केली. मुख्य महामार्गात वटवृक्षाचा अडथळा नाही. सर्व्हिस रोडमध्ये वटवृक्ष येत असल्याने या जागेत सर्व्हिस रोडचे काम स्थगित करून पर्यायी जागेचा विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे कदम यांनी यावेळी सांगितले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here