सिंधुदुर्ग,मधुसूदन नानिवडेकरः कोकणने शिवसेनेला भरभरून दिले पण शिवसेनेने कोकणला वाऱ्यावर सोडले. मंत्रिमंडळ तयार करताना शिवसेनेने कोकणच्या तोंडाला पाने पुसली. हे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यानी कणकवली येथे केला.

विरोधी पक्षनेत्याचा बंगला या सरकारने काढून घेतला .प्रत्येक मुद्यावर हे सरकार सूडबुद्धीने वागत आहे. सातबारा कोरा करणार होते ते त्यांचे आश्वासन कुठे गेले? राज्यपालांनी आठ हजार रुपये दिले तेवढेच. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या सरकारने काहीही दिलेले नाही. आम्ही विरोधी पक्ष म्हणून अनेक मुद्दे लावून धरले आहेत पण सरकार हलतच नाही. मराठी भाषा सक्तीवर सेनेने ठोस भूमिका घेतली नाही. काँग्रेस आणि शिवसेनेत या मुद्द्यावरून मतभेद आहेत त्यामुळे सरकार चालणार तरी कसे असा असा सवाल दरेकर यांनी केला. यावेळी आमदार नितेश राणे आणि भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार, आमदार रमेश पाटील उपस्थित होते.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here