बीड: चहा करताना साडीने पेट घेतल्याने ९० वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. साडीने पेट घेतल्यानंतर सरुबाई बारगजे गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारांसाठी स्वामी रामानंद शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सरुबाई विश्वनाथ बारगजे टाकळी तालुक्यातील केजमध्ये वास्तव्यास होत्या. नेहमीच्या दिनचर्यानुसार त्या सकाळी चुलीवर चहा करायला गेल्या. त्यावेळी त्यांच्या साडीचा पदर अचानक चुलीवरच्या जळत्या लाकडावर पडला आणि बघता बघता साडीने पेट घेतला. यामध्ये सरुबाई गंभीररित्या भाजल्या. आजीबाई्ंनी मदतीसाठी आक्रोश केला. आजूबाजूच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र तोपर्यंत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.
पत्नीला संपवलं, जमिनीत पुरलं, ३० किलो मीठ टाकलं; वर शेत फुलवलं; कोणालाच शंका नाही, पण…
नातेवाईकांनी आग विझवून त्यांना तातडीने केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने प्रथमोपचार करून त्यांना तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या ठिकाणी उपचारादरम्यान सरुबाईंचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी नितीन सुंदरराव बारगजे यांच्या माहितीनुसार केज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अरेरे! बाल्कनीत टेकून बसायला गेला; अंदाज चुकला, अनर्थ घडला; सहाव्या मजल्यावरून खाली पडला
घटनेचा अधिक तपास केज पोलीस करत आहेत. सरु आजींच्या मृत्यूमुळे गावात हळूहळू व्यक्त केली जात आहे. ९० वर्षांच्या आजीबाई असूनही त्या आजही त्यांची सगळी कामे स्वत: करायच्या. त्यामुळे स्वावलंबी आजींबद्दल गावात प्रत्येकालाच कुतूहल वाटायचे. मात्र चहा करताना आजीबाईंचा पदर चुकून जळत्या लाकडावर पडला आणि हृदयद्रावक घटना घडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here