पालघर : ट्रक आणि दुचाकीचा मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण असा अपघात घडला आहे. या अपघातात दुचाकीस्वार दांपत्याचा जागीच मृत्यू झाला असून नवशा लक्ष्मण पारधी व सुमन पारधी अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस घटनेचा तपास करत असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मस्तान नाका येथून नवश्या लक्ष्मण पारधी व त्यांची पत्नी सुमन पारधी हे दांपत्य आपल्या दुचाकीवरून सुपारा येथे जात होते. महामार्गावर गुजरात मुंबईच्या दिशेने जात असताना अज्ञात मालवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

साताऱ्यात मित्राला संपवून तिघांनी गाठली दापोली; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने झडप घालून घेतलं ताब्यात
या धडकेत दुचाकीस्वार दांपत्य दुचाकीवरून खाली पडून गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर दुर्वेश गावच्या हद्दीत हा अपघात घडला आहे. दुचाकीला धडक दिल्यानंतर अज्ञात मालवाहू ट्रकचा चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले व दोन्हीही मृतदेह ताब्यात घेण्यात आले. दुचाकीला धडक देऊन फरार झालेल्या ट्रक चालकाचा शोध मनोर पोलीस घेत आहेत.

एकत्र आंघोळ करताना २ सख्ख्या भावांचा दुर्देवी अंत, मामाच्या लग्नाला जायचं होतं, पण घडलं भयंकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here