इटावाः उत्तर प्रदेशातील इटावामधील ही चकरनगर भागातील हे वास्तव आहे. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत मुस्लिम कुटुंब कब्रिस्तानच्या प्रतीक्षेत आहेत. कब्रिस्तान नसल्याने कुटुंबीयांना मृतदेह आपल्या घरातच्या आवारतच दफन करावे लागत आहेत. अनेक वर्षांपासून ही स्थिती असल्याने या भागातील प्रत्येक घराला कब्रिस्तानचं स्वरुप आलं आहे. अपरिहार्यतेमुळे नागरिकांना कबरिंजवळच रहावं आणि खावं लागतंय. ग्रामस्थांनी कब्रिस्तानसाठी सरकार आणि प्रशासनाकडे अनेकदा मागणी केली. पण त्यावर अजून कुठलीही कारवाई झालेली नाही.

स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत कब्रिस्तान न मिळालने अनेकांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना निधनानंतर घरातच दफन केलंय. आपल्या घरात आतापर्यंत ३० हून अधिक जणांचे निधन झाले आहे. सर्वांना घरात दफन केलं गेलंय. मृतांसोबत राहण्याची सवय झालीय, असं बादशाह अली या ग्रामस्थांनी सांगितलं.

मृतदहे दफन केले त्याच्या बाजूल चुली

आमच्या घरात सासऱ्यांसह अनेकांचे मृतदेह दफन केले गेलेत. घरात चुलीच्या बाजूलाच मृतदेह दफन केले गेलेत. तरीही या घरात राहावं आणि जेवावं लागतं. याशिवाय आमच्याकडे कुठलाही पर्याय नाहीए. आमचे अनेक पिढ्या याच घरांमध्ये दफन आहेत. गावांत कब्रिस्तान नसल्याने कुटुंबीयांचे मृतदेह घरातच दफन करण्याची अपरिहार्य परंपरा सुरूच आहे, असं गावातील छोटी बेगम या महिलेने सांगितलं.

नेते आणि प्रशासनाचे दुर्लक्ष

गावात कब्रिस्तान नसल्याने घरातच सर्वांचे मृतदेह दफन केले गेलेत. कित्येक वर्षांपासून ही समस्या आहे. अनेक नेत्यांना भेटलो. त्यांच्याकडे मागणी केली. पण त्यावर पुढे काहीच झाले नाही, असं हताश झालेल्या तारा बेगम या महिलेने सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here