श्रद्धाची हत्या लपवण्यासाठी आफताबनं तिला ‘व्हर्च्युअली’ जिवंत ठेवलं. त्यासाठी त्यानं तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट स्वत:च्या मोबाईलवर लॉग इन केलं. श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडरच्या मेसेजला आफताबनंच रिप्लाय दिले. श्रद्धाच्या हत्येचं कारणदेखील आरोपपत्रातून स्पष्ट झालं आहे. एका ऑनलाईन डेटिंग ऍपच्या माध्यमातून श्रद्धाची ओळख एका मुलासोबत झाली. त्याला भेटण्यासाठी श्रद्धा १७ मे २०२२ रोजी गुरुग्रामला गेली होती. सकाळी घरातून निघालेली श्रद्धा रात्री परतली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रद्धा घरी आली. तेव्हा यावरून श्रद्धा आणि आफताबचा वाद झाला. भांडणादरम्यान आफताबचा पारा चढला आणि त्यानं श्रद्धाला संपवलं.
या प्रकरणात पोलिसांनी ७५ दिवसांत आरोपपत्र दाखल केलं. पोलिसांनी आफताबची नार्को टेस्ट केली. त्याआधी त्याची पॉलिग्राफी टेस्टदेखील करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपपत्र तयार केलं. आफताब श्रद्धाला मारहाण करायचा, ती अतिशय हिंसक होता, अशी माहिती श्रद्धाच्या मित्रांनी दिलेल्या जबाबातून स्पष्ट झाल्या आहेत. आफताब सतत वाद घालायचा, श्रद्धाला मानसिक आणि शारिरीक त्रास द्यायचा, अशी माहिती तिच्या मित्रांच्या चॅटमधून पुढे आलेली आहे. श्रद्धा आणि आफताबमध्ये १८ मे रोजी असाच वाद झाला. तो वाद टोकाला गेला आणि आफताबनं श्रद्धाला संपवलं.
Home Maharashtra shraddha walkar, श्रद्धाची ओळख पटूच द्यायची नव्हती; चेहरा, केसांसाठी ब्लो टॉर्च वापरला;...