नवी दिल्ली : जगभरात झालेल्या आधुनिकि‍करणामुळे पृथ्वीला मोठा धोका निर्माण झाला आहे. याचं सगळ्यात भयंकर उदाहरण म्हणजे तुर्कस्तानमधील भूकंप (earthquake in turkey). तुर्कस्तानमध्ये झालेल्या भीषण भूकंपाने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं आहे. या भूकंपामध्ये मृतांचा आकडा तब्बल ८३०० च्या पुढे गेला आहे. तुर्कीमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये तब्बल ५५० हून अधिक भूकंपाचे हादरे जाणवले. यामुळे संपूर्ण शहराचं मोठं नुकसान झालं आहे. पण या भीषण भूकंपाचा धोका भारतालाही आहे. त्यामुळे ही बातमी आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे.

अभ्यासानुसार, भारतात दरवर्षी किमान १००० वेळा भूकंप होतात. कधी भूकंपाची तिव्रता जास्त असते तर कधी कमी असते. अशात भारताचा तब्बल ५९ टक्के भूभाग हा अतिधोकादायक क्षेत्रामध्ये मोडला जातो. यामध्ये कोणत्या शहरांना सगळ्यात जास्त धोका आहे, हे आपण या बातमीतून जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

तुर्कीतील भूकंपबळींची संख्या पाच हजारांवर; भारताकडून मदतीचा हात, लष्कराने पाठवले डॉक्टर
मिळालेल्या माहितीनुसार, हिमालयीन प्रदेशांना भूकंपाचा सर्वाधिक धोका आहे. याआधीही या भागांमध्ये भूकंप झाले होते. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर जास्त असल्याचं पाहायला मिळालं. आतापर्यंत शिलाँग, कांगडा, बिहार-नेपाळ सीमा, अरुणाचल-चीन सीमा आणि नेपाळमध्ये मोठ्या भूकंपाचे धक्के जाणवले.

भूकंप म्हणजे काय…

भूकवचाखाली असणाऱ्या द्रवरूपी पदार्थामुळे जमिनीस जे हादरे बसतात त्याला भूकंप म्हणतात. भारतात संपूर्ण २४०० किलोमीटर परिसरात भूकंपाचा सर्वाधिक धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. यावर भारतीय मानक ब्युरो (BIS)कडून देशाची ५ वेगवेगळ्या भूकंप झोनमध्ये विभागणी केली आहे. यामध्ये पाचवा झोन हा सगळ्यात धोकादायक मानला जातो. या झोनमध्ये कोणती राज्य येतात, पाहुयात….

देशाच्या कोणत्या भागांना भूकंपाचा धोका?

या विभागणीनुसार, संपूर्ण देशाच्या ११ टक्के भूभाग हा पाचव्या झोनमध्ये येतो. १८ टक्के चौथ्या झोनमध्ये आणि ३० टक्के भूभाग हा तिसऱ्या आणि दुसऱ्या झोनमध्ये येतो. पाचव्या आणि चौथ्या झोनमध्ये असलेल्या राज्यांना भूकंपाचा सर्वाधिक धोका आहे.

भूकंप झोन १ :
भूकंपाच्या पिहल्या झोनमध्ये येणाऱ्या शहरांना कोणताही धोका नाहीये.

भूकंप झोन २ : भूकंपाच्या झोन २ मध्ये राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.

भूकंप झोन ३ : या झोनमध्ये लक्षद्वीप समूह, केरळ, गोवा, उत्तर प्रदेश, हरियाणाचा काही भाग, गुजरात, पंजाबचा काही भाग, पश्चिम बंगालचा, पश्चिम राजस्थान, मध्य प्रदेश, बिहारचा काही भाग, झारखंडचा उत्तर भाग आणि छत्तीसगडचा काही भाग येतो. महाराष्ट्र, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि कर्नाटकचाही काही भाग या झोनमध्ये मोडला जातो.

भूकंप झोन ४
: हिमाचल, जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंडचा काही भाग चौथ्या झोनमध्ये मोडला जातो. इतकंच नाहीतर हरियाणा, पंजाब, दिल्ली, सिक्कीम, उत्तर प्रदेशचा उत्तर भाग, बिहारचा छोटा भाग आणि पश्चिम बंगाल, गुजरात, पश्चिम किनार्‍याजवळील महाराष्ट्राचा काही भाग आणि पश्चिम राजस्थानचा छोटा भाग या झोनमध्ये येतो.

सर्वात धोकादायक झोन ५ : या झोनमध्ये, जम्मू आणि काश्मीरचा काही भाग म्हणजेच काश्मीर खोरे, हिमाचलचा पश्चिम भाग, उत्तराखंडचा पूर्व भाग, गुजरातचा कच्छ, उत्तर बिहारचा भाग, भारतातील सर्व ईशान्य राज्ये, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह या राज्यांचा समावेश आहे.

ढिगाऱ्याखाली बाळाला जन्म देऊन आईने प्राण सोडले, व्हिडिओ पाहून काळजाचं पाणी होईल…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here