काय आहे मिहीर कोटेचा यांचा आरोप?
सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत शहरातील रस्त्यांवर बसवण्यात येत असलेल्या बाकांच्या खरेदीसाठी ज्या निविदा मागवण्यात आल्या त्या २६३ कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेत प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदारांचे साटेलोटे आहे, असं मिहीर कोटेचा यांनी म्हटलं आहे. तसंच ही प्रक्रिया रद्द करून याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. अनेक प्रकारच्या वस्तूंसाठी एकाच व्यक्तीला कंत्राट देण्यात आल्याचा आरोपही कोटेचा यांनी केला आहे.
सत्ताधाऱ्यांचं मिशन मुंबई
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार केल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या ताब्यात गेल्या अनेक दशकांपासून असलेली मुंबई महानगरपालिकेची सत्ता हिसकावून घेण्यासाठी भाजप-शिंदे गट आतूर आहे. यासाठीच शहरातील रस्ते खड्डेमुक्त करतानाच पूल, फूटपाथ, उद्याने, समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, रंगरंगोटी, विद्युत सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्र्यांकडून पालिकेचा सूचना करण्यात आल्या आहेत. सत्ताधाऱ्यांच्या या प्रयत्नाला आगामी निवडणुकीत मुंबईकर नागरिक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
You made some good points there. I checked on the net for more
info about the issue and found most people will go along with your views on this web site.
Hi! I could have sworn I’ve visited this web site before but after looking at a few of the posts I realized it’s new
to me. Anyhow, I’m definitely pleased I came across it
and I’ll be bookmarking it and checking back frequently!