Authored by प्रसाद रानडे | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 10 Feb 2023, 4:36 pm

Journalist died in Rajapur | थार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर राजापूर पोलीस स्थानकात ३०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. शशिकांत वारीशे यांनी वर्तमानपत्रामध्ये पंढरीनाथ आंबेरकर यांच्यासंदर्भात बातमी दिली होती.

 

Shashikant Warishe and Pandharinath Amberkar
पत्रकाराला अंगावर गाडी घालून मारलं

हायलाइट्स:

  • संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याचा पूर्व इतिहास दबंगिरीचाच
  • रिफायनरी विरोधकांचा कर्दनकाळ
रत्नागिरी: कोकणातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे याचा अपघात घडवून हत्या करणारा संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर याच्यावर कुणाचा गुन्हा तसेच पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान रिफायनरी समर्थक असलेला पंढरीनाथ आंबेरकर याचा पूर्व इतिहासही दबंगगिरीचाच असल्याची माहिती आता पोलीस तपासात समोर आली आहे. यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत अशी माहिती आता पोलीस तपासात पुढे आली आहे. काल छातीत दुखत आहे म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या संशयित पंढरीनाथ आंबेरकर याची रवानगी पुन्हा आज शुक्रवारी कोठडीत करण्यात आली. दरम्यान या सगळ्या निषेध नोंदवण्यासाठी राज्यातील आज सगळे पत्रकार सगळ्या जिल्हयात व तालुक्यात एकत्र आले होते. या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल राज्य व राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या संघटनांनी घेतली आहे.

एप्रिल २०१० मध्ये राजापूरच्या कुंभावडे गावचे सरपंचांचा मुलगा असणाऱ्या मनोज मयेकर यांच्यावर हल्ला झाला होता. मनोज मयेकर हे सामाजिक कार्यकर्ते होते. मनोज मयेकर आणि पंढरीनाथ आंबेरकर एकाच गावात राहायला होते. मनोज मयेकर यांनाही पंढरीनाथ आंबेरकर यांच्या गाडीने धडक दिली होती. यानंतर मनोज मयेकर यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. याप्रकरणात पोलिसांनी पंढरीनाथ आंबेरकरला अटक केली होती. पण नंतर आंबेरकरला याप्रकरणात जामीन मंजूर झाल्याने तो तुरुंगाबाहेर आला होता.
सकाळी पेपरात बातमी अन् दुपारी गाडीने उडवलं, रत्नागिरीतील पत्रकाराच्या मृत्यूचं गूढ उकललं
याशिवाय,जिल्ह्यातील एका नेत्याच्या विरोधात रिफायनरी विरोधक संघटनेच्या सभेमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले होते. त्यानंतर आंबेरकर आणि काही जणांनी १२ नोव्हेंबर २०२२ रोजी राजापूर कोर्टाच्या आवारामध्ये नरेंद्र जोशी या रिफायनरी विरोधकांच्या नेत्यावर हल्ला केला. या प्रकरणी संशयित आंबेरकर याच्या विरोधात राजापूर नाटे पोलीस स्टेशन येथे कलम १४३, १४६, १४७, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
मुंबई-गोवा हायवेवर जीपची समोरुन धडक, गाडीने स्कूटरला २५० फूट दूर फरफटत नेले
तर राजापूर तालुक्यातील नाटे पोलीस स्टेशन हद्दीत अश्विनी अशोक वालम यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी १४ जानेवारी २०१८ रोजी कलम १४३, १४७, १४९, ३२३, ५०४ आणि कलम ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्विनी वालम या कोकण रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांच्या पत्नी आहेत. त्यांच्यासह काही महिला एकत्र आल्या होत्या. त्यावेळीही शिवीगाळ करण्यात आली आणि अशोक वालम यांना मारण्याची धमकी देण्यात आली, असा उल्लेख या ‘एफआयआर’मध्ये करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here