मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांनी सोमवारी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. चोरीचा आरोप केल्यानं पोलिसांनी तरुणीला अटक केली होती. तिच्यासोबत शिकणाऱ्या तरुणासोबत लग्न करण्याआधी तिनं घरातून दागिने आणि रोकड चोरली होती. त्यानंतर मुलीनं न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयानं तिची बाजू ऐकून घेतल्यानंतर जामीन मंजूर केला.
मुलीच्या म्हणण्यानुसार, कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिला. त्यानंतर २० जुलै रोजी तिनं घर सोडण्याचं ठरवलं. मुलीच्या वडिलांनी चिंचवड पोलिसांत ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर २४ जुलै रोजी मुलगी आणि तरूण स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर पोलिसांनी तिच्या आई-वडिलांना बोलावून घेतले. मुलीनं लग्न केल्याचं आणि पतीसोबतच राहणार असल्याचं सांगितलं.
२६ जुलै रोजी मुलीच्या वडिलांनी मुलीवर चोरीचा आरोप केला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. २४ जुलैला मुलीला पोलीस ठाण्यात पाहिलं. मुलीच्या अंगावरील दागिन्यांपैकी काही दागिने हे घरातून चोरी केल्याचे त्यांनी सांगितले. घरी परतल्यानंतर मुलीनं ३.९५ लाख रुपये किंमतीचे दागिने आणि रोकड चोरल्याचे लक्षात आले, असे त्यांनी तक्रारीत म्हटले. वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करून सोमवारी तिला अटक केली. न्यायालयात तिला हजर केले असता, कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यानंतर मुलीनं जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. केल्यानंतर धर्मांतर केल्याच्या नाराजीतून वडिलांनी माझ्यावर चोरीचा खोटा आरोप केला, असं तिनं न्यायालयात सांगितलं. त्यानंतर न्यायालयानं तिला जामीन मंजूर केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Thank you ever so for you article post.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.