मुंबई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला. अतिवेगामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट दुभाजकाला जाऊन धडकली. हा भीषण अपघात सकवार हद्दीत झाला असून या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. दोघे गंभीर जखमी असून जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. मिरो रोडच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

अतिवेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये प्रभादेवी येथे राहणारे अशोक मुसळे (वय ७१), रमेश मुसळे (वय ५१), माधुरी मुसळे (वय ५०) आणि रुचिक देसाई (वय ३०) हे चौघे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून पालघरला कारने जात होते. सकवर गावाच्या हद्दीतील पेट्रोल पंपापासून ४०० मीटर अंतरावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कर थेट दुभाजकाला धडकली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुंबईकरांची ४५ मिनिटे वाचणार, बीकेसीतील कोंडी फुटणार; या दोन उड्डाणपुलांमुळं मिळणार मोठा दिलासा
अपघातात जखमी झालेल्या २ जणांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रमेश मुसळे आणि रुचिक देसाई या दोघांचा मृत्यू झाला. तर अशोक मुसळे आणि माधुरी मुसळे या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी मीरा रोडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

राष्ट्रवादीकडून स्टार प्रचारकांच्या यादीत नाव, मात्र मैदानात उतरणार की नाही? अमोल कोल्हे म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here