मुंबईः लॉकडाउनमध्ये लागू करण्यात आलेल्या नियमावलीच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांना करोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. करोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या ८ हजार ९५८वर पोहोचली आहे. तर, ९८ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या मृत्यूमागे त्यांची अयोग्य जीवनशैली कारणीभूत असल्याचा दावा एका अहवालातून समोर आला आहे.

अयोग्य जीवनशैली, प्रकृतीच्या तक्रारी, असंतुलीत आहार यासगळ्यांचा अप्रत्यक्षरित्या प्रभाव पोलिसांवर होत आहे. तासंतास ड्युटीवर असल्यानं व्यायामाचा अभाव तसंच, ड्युटीसाठी सतत बाहेर असल्यामुळं बाहेरील खाद्यपदार्थामुळं पोलिसांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. यामुळंच रोगप्रतिकार शक्तीही कमी झाली असल्याची शक्यता आहे. पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांना या समस्यांमुळं करोना संसर्गामुळं जीव गमवावा लागला आहे. यापुढं पोलिसांच्या आरोग्याबाबतीत यापुढे अधिक काळजी घेण्यात येईल, जेणेकरून त्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढेल, असं सह पोलिस आयुक्त नवल बजाज यांनी सांगितलं.

पोलिसांमधील करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पोलिस प्रशासनानं काही उपाययोजनाही आखल्या आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये तैनात असलेल्या पोलिसांना ड्युटीनंतर दोन ते तीन दिवसांची सुट्टी देण्यात येत आहे. जेणेकरून त्यांना आराम करण्यास वेळ मिळेल. असंही बजाज यांनी म्हटलं आहे.

५५ वर्षांहून अधिक वय असलेल्या पोलिसांमध्ये करोनाचा प्रसार अधिक आहे. करोनामुळं मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांमध्ये ५५ वर्षांहून अधिक वय असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळं या कर्मचाऱ्यांना सुट्टीवर पाठवण्यात आलं आहे. त्यामुळं सध्या तरुण पोलिस शिलेदार ड्युटीवर आहेत. म्हणूनच पोलिस दलातील रिकव्हरी रेट वाढला असून मृत्यूदर कमी आहे.

वाचाः

मागील २४ तासांत राज्यात २३६ पोलीस करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले, तर एकाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत ९८ पोलिसांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळं ८ हजार ९५८ पोलिसांवर करोनावर उपचार सुरु आहेत. त्यातील ६ हजार ९६२ जणांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळं राज्यात सध्या १ हजार ८९८ अॅक्टिव्ह पोलिस असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

वेळोवेळी पुरेशा सुविधा

पोलिस दलामधील संसर्गाची व्याप्ती पाहता त्यांना सी व्हिटॅमिन गोळ्या, मास्क, फेस शिल्ड, सॅनिटायझर याचा पुरवठा करण्यात येत आहे. पोषक आहार तसेच व्यायामाचे धडेही पोलिसांना देण्यात आले आहेत. करोना पॉझिटिव्ह आलेल्या पोलिसांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी पोलिस कुटुंब आरोग्य योजनेत या आजाराचा समावेश करण्यात आला. इतकेच नाही तर मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक रुग्णालयात पोलिसांवर उपचारांची व्यवस्था करण्यात आली. याचाच परिणाम म्हणजे पोलिसांचे या आजारातून बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. पोलिसांवरील ताण, त्यांच्यातील संसर्ग कमी करायचा असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी नियमांचे पालन करायला हवे, असे मत या व्यक्त करण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

  2. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here