वॉशिंग्टन: जगभरात करोनाच्या संसर्गाने थैमान घातले असल्यामुळे अनेकांच्या मनात करोनाची भीती निर्माण झाली आहे. त्यातच एकदा करोनाची बाधा झाल्यानंतर पुन्हा करोनाची बाधा होण्याची भीती व्यक्त केली जाते. मात्र, नव्या अभ्यासानुसार, करोनाची दुसऱ्यांदा बाधा होण्याची शक्यता कमीच असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

करोनाबाधा दोन वेळा होऊ शकते का, या प्रश्नाचे उत्तर शास्त्रज्ञ खात्रीपूर्वक देऊ शकत नसले तरी अशी शक्यता जवळपास नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील काही विद्यापीठात याबाबत संशोधन झाले आहे. एकदा करोनाची बाधा झाल्यावर त्या संसर्गासाठी काही प्रमाणात प्रतिकारशक्ती निर्माण होत असली, तरी ती किती काळ टिकेल, याबाबत साशंकता आहे. करोनामुक्त झालेले रुग्ण काही आठवड्यांनंतर पुन्हा पॉझिटिव्ह आल्याच्या काही घटना नोंदवण्यात आल्या आहेत. पूर्वीच्या संसर्गाचे काही अवशेष या चाचण्यामध्ये आढळत असतील. त्यामुळेच त्यांची चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे समोर येत असावी. त्याशिवाय अनेकदा करोनाची बाधा झाली असल्याचे सांगणारी चाचणी चुकीचे असल्याचे आढळले आहे. या अशा प्रकरणांमध्येही चाचणी चुकीच्या प्रकारे आढळत असेल असे म्हटले जाते.

वाचा:

वाचा:
बोस्टन कॉलेजमधील ग्लोबल हेल्थ प्रोग्रामचे संचालक डॉ. फिलिप लँड्रीगन यांच्या मते हे नवीन विज्ञान संशोधन आहे. एका अभ्यासानुसार करोनाविरोधात निर्माण झालेले अॅण्टीबॉडी फार काळ शरीरात टिकत नाहीत. फक्त काही महिनेच अॅण्टीबॉडी राहतात. त्यामुळे पुन्हा संसर्ग होण्याचा धोका असतो, पण अॅण्टीबॉडी हा करोनापासून बचाव करण्याचा पर्याय नसून रोगप्रतिकारक शक्तींचे इतर पर्यायांपासून करोनाचा बचाव करता येऊ शकतो, असे संशोधकांनी म्हटले आहे.

वाचा:

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनेही हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधाचा वापर हा करोनाबाधितांवर प्रभावी असल्याचे अद्याप सिद्ध झाले नसल्याचे म्हटले आहे. या औषधाच्या वापरामुळे हृदयविकार वाढण्याचा धोका असल्याचा इशारा आरोग्य तज्ञांनी दिला आहे. त्याशिवाय मागील महिन्यातच अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने करोनाबाधितांच्या उपचारासाठी या औषधाच्या वापराबाबत इशारा दिला आहे.

वाचा:
जगभरात एक कोटी ६० लाखजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, सहा लाख ४४ हजारजणांना करोनाची बाधा झाली आहे. अमेरिकेत करोनाने थैमान घातले असून ४१ लाख जणांना बाधा झाली आहे. तर, जवळपास एक लाख ४६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये २४ लाख ८४ हजारजणांना करोनाची बाधा झाली असून ८८ हजारजणांचा मृत्यू झाला आहे.भारतातही करोनाबाधितांची संख्या १५ लाखांहून अधिक झाली असून ३४ हजारजणांचा मृत्यू झाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

  2. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here