Samir Jain, Times Litfest: भारतीय साहित्य आणि अध्यात्म हे एकमेकांपासून वेगळे नाहीत… टाइम्स ग्रुपचे व्हीसी आणि एमडी समीर जैन यांनी सादर केले संत कबीरांचे दोहे – times litfest indian literature is indistinguishable from spirituality says times group vc and md samir jain
नवी दिल्ली : ‘भारतीय साहित्य आणि अध्यात्म एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यांना वेगळे करता येत नाही. भारतीय आध्यात्मिक ग्रंथांमध्ये जे काही लिहिले आहे ते साहित्य म्हणून घेतले पाहिजे. ही गोष्ट विशेषतः तरुणांना लागू होते. आजचे तरुण जे काही आता वाचत आहेत, त्या पुस्तकांपेक्षा ही पुस्तके वाचताना त्यांना अधिक प्रसन्न वाटेल’, असे प्रतिपादन टाइम्स ग्रुपचे व्हीसी आणि एमडी समीर जैन यांनी केले आहे. टाइम्स लिटफेस्टमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी संत कबीर यांच्या दोहे देखील सादर केले.
टाइम्स ग्रुपचे व्हीसी आणि एमडी समीर जैन म्हणाले की, ‘मला विचारले तू शाळेत काय शिकलास? तेव्हा मी सांगितले की मास्तरांनी मला दिनकर यांच्या कवितेचा अर्थ सांगितला आणि मी त्यांच्यासमोर तो अर्थ मांडला. तर त्यावर ते म्हणाले की, मी असा विचारही केला नव्हता. तर तुमच्याकडे ही शक्ती असेल तर तुम्ही दिनकर, महाश्वेता देवी, हरिवंशराय बच्चन यांनी विचारही केला नसेल, असा अर्थ तुमच्या कवितांना तो देऊ शकता.’ ते पुढे म्हणाले, ‘कर्तव्याच्या वरही एक स्थान आहे, गीतेत सांगितले आहे की, जो आत्म्यामध्ये आत्म्याने तृप्त आहे, त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य नाही. याच्या वर देखील एक अवस्था आहे, जो जीवनाचा सर्वात मोठा उद्देश आहे. योगवशिष्ठ म्हणतात, जन्म आणि मृत्यू हे सूर्याचे उगवणे आणि मावळणे याप्रमाणे मौखिक परंपरा आहेत. ही एक ओळ… काय हे साहित्य आहे, हे अध्यात्म आहे, तुम्ही ठरवा. आम्ही म्हणतो की हे दोन्हींचे मिश्रण आहे.’ ऑस्ट्रेलियाला भारताच्या शेपटानेच दिला मोठा तडाखा, विजयासाठी ठरली ही महत्वाची गोष्ट… ‘अध्यात्मात काळी बाजू सापडणार नाही’
साहित्याच्या काळ्या बाजूवर भाष्य करताना समीर जैन म्हणाले, ‘तुम्हाला अध्यात्मातील काळी बाजू सापडणार नाही, पण हृदय आणि मनाला उंच आकाशात नेण्याची प्रतिक्रिया मिळत जाईल. ते पुढे म्हणाले, ‘जसे शेक्सपियरचे मॅकबेथ आम्ही तीन-तीन वर्षे शाळा-कॉलेजमध्ये शिकलो, त्यात लेडी मॅकबेथ आपल्या पतीला राजाला मारून राजा बनण्यास सांगते. ते खूप लांबलचक भाषण आहे. तरुण वयात ते उत्स्फूर्तपणे लक्षात राहते आणि ते मनातून काढून टाकणे फार कठीण असते. ही साहित्याची काळी बाजू आहे आणि ती अध्यात्मात सापडणार नाही.’
देवेंद्र फडणवीस- पंकजा मुंडेंमधील कथित मतभेद मिटले?, एकाच वाहनातून बैठकीला आल्याने चर्चा समीर जैन पुढे म्हणाले, ‘साहित्यात फक्त विरहाच्या गीतांनाच पुरस्कार मिळतात. परंतु अध्यात्मिक साहित्यात, विभक्त होणारे प्रेम सापडणार नाही किंवा ते सापडलेच तर फारच कमी प्रमाणात सापडेल. मानव-मानवाचे प्रेम फार कमी काळ टिकते. देवाचे प्रेम शतकानुशतके टिकते. चित्रपटातील लोकांनीही ते स्वीकारले. ‘सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था…’ ही आध्यात्मिक प्रेमाची झलक आहे, जिथे दोघे हे दोघे न राहता ते एकरूप होतात. चित्रपट दिग्दर्शकही पॉप संगीताची जोड देऊन उच्च गोष्टी सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करताना दिसतात.’