सोलापूर: पाणी तापवण्यासाठी भल्या पहाटे पेटवलेली चूल वृद्ध दाम्पत्यासाठी जीवघेणी ठरली. वारा वाहत असल्यामुळे चुलीतून उडालेल्या ठिणगीमुळे झोपडीने पेट घेतला. त्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये संपूर्ण झोपडी पेटली. त्यामध्ये असलेल्या वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला. बार्शी तालुक्यातील गाडेगाव शिवारात ही घटना घडली. वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

भीमराव काशीराम पवार (वय ९५) आणि कमल भीमराव पवार (वय ९०) अशी मृत्यूमुखी पडलेल्या वृद्धांची नावे आहेत. बार्शी पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. घटनेची माहिती मिळताच माहिती मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गोरख भोसले, सर्जेराव गायकवाड, राजेंद्र मंगरूळ, आप्पासाहेब लोहार, महेश डोंगरे व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
बेडूक घरात घुसल्यानं संतापला; तुकडे करुन शिजवले, पोरांना खाऊ घालून झोपला अन् त्याच रात्री…
पाणी तापवण्यासाठी चूल पेटवली, पण घात झाला
कमल भीमराव पवार यांनी पहाटे उठून पाणी तापवण्यासाठी चूल पेटवली होती. त्याचवेळी म्हैस सुटल्यामुळे त्यांना नातू प्रथमेशला उठवले. म्हैस बांधत असताना झोपडीला आग लागली. आजी आणि नातवाने आग विझवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे संपूर्ण झोपडीने पेट घेतला.
अस्वस्थ वाटू लागलं, ECG नॉर्मल; तासाभरात तरुणाचा मृत्यू; १२ दिवसांपूर्वीच झाला होता साखरपुडा
झोपडीत वृद्ध पती पत्नी मृत्यू
कमलबाई यांचे पती भीमराव पवार झोपडीत झोपलेले असल्यामुळे त्यांना उठवण्यासाठी कमलाबाई आत गेल्या होत्या. मात्र आग वाढल्याने दोघेही आत अडकले. संपूर्ण झोपडीने पेट घेतल्यामुळे दाम्पत्याला बाहेर पडता आले नाही. वृद्ध पती, पत्नीचा आगीत होरपळून मृत्यू झाला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here