“यामध्ये आणखी एक महिला त्यांना साथ द्यायची. तिचं नाव राणी उदासी आहे. मी नीतू आणि कृष्णा यांच्या व्हॉट्सअॅप चॅटवर लक्ष ठेवत होतो. मला चॅटमधून अशीही माहिती मिळाली की, बागेत भेटल्यानंतर नीतू ही कृष्णाच्या खोलीतही जायची. ती कृष्णाला महागड्या भेटवस्तू द्यायची. ती मला सांगायची की तो माझा भाऊ आहे आणि पैशांचा व्यवहारही करायची. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा काही दिवसांपूर्वी नीतूने प्रियकर कृष्णाला एक मोठी गाडी भेट म्हणून दिली. ही कार नीलूच्या नावावर आहे”, असंही त्यांनी या पत्रात लिहिलं.
“नीतू, कृष्णा आणि राणी घरी एकत्र तंत्र-मंत्र करत असत. गेल्या वर्षभरापासून ती मला स्लो पॉयझन देत होती. यामुळे मी सुस्त होऊ लागलो होतो. माझे संपूर्ण शरीर काळे पडले आहे. हे सर्व शवविच्छेदनात कळेलच. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्या सर्वांच्या चॅट्सशी चौकशी करून त्यांना शिक्षा सुनावण्यात यावी”.
पत्नी नीतूने त्याला काहीतरी खाऊ घालून संपूर्ण मालमत्ता आपल्या नावावर करून घेतली आहे, असेही त्याने या पत्रात सांगितलं. मृत्यूनंतर ही संपत्ती त्याचा मुलगा युवराज आणि आई-वडिलांना देण्यात यावी. तिला मला मारायचे होते, म्हणून तिने सगळीकडे नॉमिनी म्हणून आपले नाव टाकले आहे. माझ्या मृत्यूला हे तिघे जबाबदार आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं तपास अधिकारी बीएस कुमरावत यांनी सांगितलं.