देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
पहाटेच्या शपथविधीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, माझ्यासोबत दोनवेळा विश्वासघात झाले. पहिला हा उद्धव ठाकरेंनी केला. त्यांनी निवडणुका आमच्यासोबत लढल्या, पण जेव्हा त्यांना हे लक्षात आलं की ते मुख्यमंत्री होऊ शकतात तेव्हा त्यांनी माझा फोन घेणंही बंद केलं. त्यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची इतकी प्रिय होती की त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी केली.
तर दुसरा हा राष्ट्रवादीने केला, पण त्यांना मी कमी दोष देईल कारण आम्ही निवडणुका त्यांच्यासोबत लढलो नव्हतो. उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चा करत असताना आम्हाला राष्ट्रवादीकडून ऑफर आली होती की आम्हाला स्थिर सरकार हवंय. तेव्हा शरद पवारांशी चर्चा झाली होती. त्यानंतरच गोष्टी ठरल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्या कशा बदलल्या हे सर्वांनी पाहिलं आहे. टीव्ही-९ मराठीच्या महाराष्ट्राचा महासंकल्प या कार्यक्रमात ते बोलत होते.
शरद पवारांनी काय उत्तर दिलं?
देवेंद्र फडणवीसांनी हा गौप्यस्फोट केल्यानंतर शरद पवारांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया देत म्हटलं, “देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आणि सभ्य व्यक्ती आहेत. असत्याचा आधार घेऊन अशा प्रकारची विधानं ते करतील, वाटलं नव्हतं”.
massianic singles free dating sites local singles near me free free
phone chat lines sites online dating