पुणे: कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या प्रचाराची तोफ धूमधूमत असताना आता स्थानिक नेत्यांनी टीकेचे धारआणखीन तीक्ष्ण केली आहे. मतदानाची तारीख जवळ येताच कॉर्नर सभा आणि जोरदार रॅलीच दोन्ही उमेदवारांकडून आयोजन करण्यात येत आहे. आजच्या महाविकास आघाडीच्या कॉर्नर सभेमध्ये काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी भाजपच्या उमेदवार हेमंत रासने यांच्यावर जहरी टीका केली आहे.

कसबा मतदारसंघात सोमवारी महाविकास आघाडीच्यावतीने कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थित होती. सोबत उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार संग्राम थोपटे आणि स्थानिक नेते उपस्थित होते. या प्रसंगी भाषण करताना काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे चांगलेच आक्रमक झाले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना चांगलंच धारेवर धरत हेमंत रासने यांना लक्ष्य केले.
कसबा गाडगीळांचा, बापटांचा, टिळकांचा; धडा कसा शिकवायचा ठरलंय, पुण्यातील बॅनरबाजी चर्चेत
यावेळी अरविंद शिंदे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, एका चित्राला आंतरराष्ट्रीय दर्जाचा पारितोषिक मिळालं. ते चित्र होतं साऊथ आफ्रिकामधील, उपासमारीमुळे एक लहान मुलगा मरत होता आणि गिधाड त्याच्या बाजूला बसलं होतं. गिधाड वाट पाहत होतं की, लहान मुलगा कधी मरेल आणि मी कधी त्याला खातो. या छायाचित्राला आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार मिळाला. हा संदर्भ याचा साठी देत आहे की, मुक्ताताई अडीच वर्षे आजारी असताना अनेक जण भेटायला जात होती. पण त्यांचे काही इच्छूक उमेदवार गिधाडासारखे त्यांच्या मरणाची वाट बघत होते. मुक्ता टिळक यांनी तरतूद केली होती, तीच काम थांबवण्याचं काम हेमंत रासने करत होता. हे मी नाही सांगत तर मुक्ता टिळकांचे मिस्टर शैलेश टिळक यांनी देवेंद्र फडणवीसला यांना सांगितले. असा उमेदवार तुम्ही देत आहेत .ज्याने ताईच्या मरण्याची वाट पाहिली, असे शैलेश टिळक यांनी म्हटल्याचा दावा अरविंद शिंदे यांनी केला. अरविंद शिंदे यांच्या टीकेनंतर मोठा वादंग होण्याची शक्यता वर्तवली जाते. अरविंद शिंदेच्या या टीकेनंतर भाजप काय भूमिका घेते, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

‘कसब्याची चिंता करू नका, मी इथे बसलोय’; गिरीश बापट यांचा एकनाथ शिंदेंना ‘विजयाचा’ शब्द, मविआचं टेन्शन वाढणार

वसंत मोरेंचे भाजपवर ताशेरे

मनसे नेते वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपच्या सोयीस्कर राजकारणावर टीका केली होती. वसंत मोरे यांनी पुणे महानगरपालिकेची निवडणूक घेण्याची मागणी केली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघात भाजपच्या दोन आमदारांचं नुकतंच निधन झालं. पण आपली मते कमी होतील, म्हणून भाजपने याठिकाणी लगेच निवडणुका लावल्या. गेल्या एक वर्षापासून पुण्यात कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही. प्रशासनाने शहराचे वाटोळे केले आहे, अशी टीका वसंत मोरे यांनी केली.

कोश्यारींचा फोटो लावलेले काळे फुगे उडवण्याची कार्यकर्त्यांची विनंती, अजितदादांनी डोक्याला हात लावला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here