१) शिखर धवन
भारतीय क्रिकेट संघातील अनुभवी आणि स्टार सलामीवीर शिखर धवनसाठी गेल्या काही दिवापासून गोष्टी ठीक होत नाहीत. कसोटी संघापाठोपाठ त्याला टी-२० आणि वनडे संघातून वगळण्यात आले. शिखर भारतात होणाऱ्या २०२३च्या वनडे वर्ल्डकपच्या खेळाडूंच्या यादीत नाही. शिखरने २०१३ साली कसोटी करिअरची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार शतक करून केली होती. शिखरने पदार्पणाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची धुलाई केली होती. मर्यादीत षटकाच्या क्रिकेटपाठोपाठ शिखर कसोटीत धमाका करेल असे वाटत होते पण तो हळूहळू फ्लॉप होत गेला.
मोठी धाव संख्या खेळण्यात अपयशी ठरलेल्या शिखरला संघाबाहेर कधी केले हे कळाले देखील नाही. शिखरने भारताकडून अखेरची कसोटीत २०१८ साली इंग्लंडविरुद्ध खेळली होती. त्याने भारताकडून ३४ कसोटीत ४०.६च्या सरासरीने २ हजार ३१५ धावा केल्या आहेत. ज्यात ७ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.
२) भुवनेश्वर कुमार
भारतीय संघातील अनुभवी आणि स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला देखील टीममधून बाजूला करण्यात आले. एक वेळ अशी होती भुवी भारताचा सर्वात महत्त्वाचा गोलंदाज होता आणि तिनही फॉर्मेटमध्ये खेळत होता. मात्र अचानक त्याला कसोटी संघातून वगळण्यात आले. त्यानंतर आता काही महिन्यांपूर्वी त्याला वनडे आणि टी-२० संघातून वगळले गेले.
भुवीचे कसोटी करिअर तर २०१८ सालीच संपले होते. चांगली कामगिरी केल्यानंतर देखील त्याला संघाबाहेर करण्यात आले. भुवीने भारतासाटी २१ कसोटी खेळल्या त्यात २६.१च्या सरासरीने ६३ विकेट घेतल्या होत्या.
३) इशांत शर्मा
भारतासाठी १०० हून अधिक कसोटी खेळणारा जलद गोलंदाज इशांत शर्माचा देखील समावेश अशा खेळाडूंमध्ये होतो ज्यांचे कसोटी करिअर संपले आहे आणि लवकरच निवृत्ती जाहीर केली जाऊ शकते. इशांत २०२१ पर्यंत भारतासाठी सातत्याने कसोटी खेळत होता. त्यानंतर संघात असे जलद गोलंदाज आले, ज्यामुळे इशांत संघाबाहेर फेकला गेला.
आता इशांतला कसोटीत संधी मिळत नाहीय. त्याने २०२१ मध्ये अखेरची कसोटी खेळली होती. वाढत्या वयामुले इशांत निवृत्ती घेऊ शकतो. त्याने भारताकडून १०५ कसोटीत ३२.४च्या सरासरीने ३११ विकेट घेतल्या आहेत.