नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीनंतर भारतीय क्रिकेट संघाने इतिहास घडवला आहे. ICCद्वारे बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या क्रमवारीत टीम इंडिया कसोटीत अव्वल स्थानी पोहोचले आहे. भारतीय संघाची ही कामगिरी ऐतिहासिक यासाठी कारण सध्या भारतीय संघ टी-२० आणि वनडेत देखील अव्वल स्थानी आहे. आता कसोटीमुळे भारत तिनही फॉर्मेटमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे.

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असे प्रथमच घडले आहे की संघ एकाच वेळी आयसीसीच्या तिनही क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली भारताने हा नवा इतिहास रचला आहे. सध्या रोहित शर्मा वनडे आणि कसोटीचे तर हार्दिक टी-२०मध्ये नेतृत्व करतोय.

IND vs AUS: दुसऱ्या कसोटीआधी भारतीय संघाला मिळाली गुड न्यूज; विजयाचा हुकमी एक्का संघात परतला
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून दर बुधवारी ताजी क्रमवारी जाहीर केली जाते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या नागपूर कसोटीनंतर प्रथमच क्रमवारी अपडेट झाली आहे आणि याचा फायदा टीम इंडियाला झालाय. कसोटीत भारताचे ११५ रेटिंग्स आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया असून त्याचे १११ रेटिंग्स आहेत.

कसोटी मालिका सुरू होण्याआधी भारतीय संघ वनडे आणि टी-२० मध्ये अव्वल स्थानी होता. नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियावर १ डाव आणि १३२ धावांनी विजय मिळून टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आणि कसोटीतील अव्वल स्थान देखील मिळवले.

नागपूरमध्ये पिचला घाबरले आता दिल्लीत ऑस्ट्रेलियापुढे वेगळंच टेन्शन; मॅचच्या आधीच शस्त्रं टाकली
भारतीय संघ कसोटीत १९७३ साली सर्वप्रथम अव्वल स्थानी पोहोचला होता. त्यानंतर मोठ्या कालावधीनंतर म्हणजेच २००९ साली महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारत कसोटीत अव्वल स्थानी पोहोचला. २०११ पर्यंत भारत कसोटीत अव्वल स्थानी होता. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत २०१६ मध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थानी पोहोचला, तेव्हा टीम इंडिया एप्रिल २०२० पर्यंत पहिल्या स्थानी होता. तेव्हापासून भारत नेहमीच पहिल्या ३ मध्ये राहिला आणि आता पुन्हा एकदा नंबर १चे स्थान मिळवले.

ICC Ranking

खेळाडूंना देखील झाला फायदा

नागपूर कसोटीतील शानदार कामगिरीचा फायदा फक्त संघाला झाला नाही तर भारतीय खेळाडूंना देखील झाला आहे. नागपूर कसोटीत शतक करणारा रोहित शर्मा फलंदाजांच्या क्रमवारीत आठव्या स्थानावर आहे. ऋषभ पंत सातव्या स्थानावर आहे. गोलंदाजीत आर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला, त्याने नागपूर कसोटीत ८ विकेट घेतल्या होत्या. जसप्रीत बुमराह पाचव्या स्थानावर आहे. ऑलराउंडरच्या यादीत रविंद्र जडेजा अव्वल स्थानी तर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here