लंडन : ब्रिटनचे किंग चार्ल्स तिसरे यांचा राज्याभिषेक मे महिन्यात होणार आहे. या राज्याभिषेक सोहळ्यात किंग चार्ल्स यांच्या पत्नी कॅमिला क्वीन मॅरी यांचा मुकूट परिधान करणार आहेत. कॅमिला या कोहिनूर हिऱ्याचा त्या मुकूटात वापर करणार नाहीत. १०५ कॅरटचा कोहिनूर हिरा भारतातून इंग्लंडला नेण्यात आला होता. भारतानं इंग्लंडके हिरा माघारी देण्याची मागणी केली आहे.

भारतात ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता असताना कोहिनूर हिरा इंग्लंडला नेण्यात आला होता. कंपनीनं तो हिरा व्हिक्टोरिया राणीला भेट दिला होता. भारतानं कोहिनूर हिरा परत मिळावा यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. भारतासह पाकिस्तान, अफगाणिस्ताननं देखील १९४७ पासून कोहिनूर हिऱ्यावर दावा केला आहे.

एलिझाबेथ यांचं सप्टेंबर २०२२ मध्ये निधन झालं होतं. त्यामुळं चार्ल्स हे किंग होणार आहेत. किंग्ज चार्ल्स आणि कमिलिया यांचा राज्याभिषेक सोहळा ६ मे रोजी लंडनच्या वेस्टमिनिस्ट अॅबेमध्ये होणार आहे. कॅमिला यांनी राज्याभिषेकाच्या कार्यक्रमातील मुकुटामध्ये कोहिनूर हिऱ्याचा वापर केल्यास भारतासोबतच्या राजनैतिक संबंधांवर परिमाम होईल अशी शक्यता असल्यानं त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचा अंदाज आहे. यावेळी त्यामुळं बदल करण्यात येणार आहेत, असं देखील सांगण्यात आलं आहे.

कोहिनूर हिऱ्याचा इतिहास

कोहिनूर हिरा गोवळकोंडा येथील एका खाणीत आढळला होता. कुतुबशाहीतील अधिकारी मीर जुमला यानं हा हिरा मोघलांची चाकरी पत्कारल्यानंतर मुघल सम्राट शहाजहानला दिला. त्यानंतर पुढच्या काळात वारसानं तो हिरा औरंगजेबाकडे आला होता. पुढच्या काळात मुघल सत्ताधीशांचा प्रभाव कमी होत गेला.

घराबाहेर फेरी मारली, दार उघडताच चिठ्ठी देत डाव साधला,राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांवर जीवघेणा हल्ला

दरम्यानच्या काळात इराणच्या नादिरशहानं भारतात स्वारी केली होती. त्यावेळी कोहिनूर आणि इतर मौल्यवान वस्तू लुटून नेल्या. या काळात नादिरशहाचा खून झाल्यानंतर अफगाणिस्तानची निर्मिती झाली. अहमदशहा अब्दालीनं अफगाणिस्तानची निर्मिती केली. पुढच्या काळात हा हिरा हा पंजाब प्रातांचे महाराजा रणजितसिंग यांच्याकडे आला.

तांबे पॅटर्नची पुनरावृत्ती होणार? आता अशोक चव्हाणांची फडणवीसांच्या खास माणसाला स्टेजवरुन ऑफर

१८४८ ते ४९ च्या रम्यान हा हिरा रणजितसिंग यांचा मुलगा दिलीपसिंग यांच्या काळात हिरा इंग्रजांकडे केला. जॉन लॉरेन्स आणि हेन्री लॉरेन्स यांनी हा हिरा राणी विक्टोरियाकडे दिला.

भारतीय क्रिकेट संघाने इतिहास घडवला; रोहित, हार्दिकच्या नेतृत्वात आजवर कधीही न झालेली कामगिरी केली

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here