साहिलचा साखरपुडा झाल्याचं ९ फेब्रुवारीला निक्कीला समजलं. नंतर त्यांची भेट झाली. त्यांनी गोव्याला पळून जायं ठरवलं. पण साहिलला गोव्याची तिकिटे मिळाली नाहीत, तेव्हा त्यांनी उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशला पळून जाण्याचा प्लॅन आखला. ते आधी आनंद विहार आणि नंतर काश्मिरी गेटवर पोहोचले.
साहिलच्या पालकांना याबाबत कुणकुण लागली होती. त्यामुळे त्यांनी साहिलवर परत येण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. साहिल परत जायला निघाला, तेव्हा निक्कीने त्याच्याशी भांडायला सुरुवात केली. आपण आत्महत्या करुयात, असंही निक्कीने साहिलला सुचवलं, पण त्याला ते मान्य नव्हते. जेव्हा निक्कीने त्याच्या पालकांबद्दल अपशब्द बोलण्यास सुरुवात केली तेव्हा त्याला संताप अनावर झाला आणि त्याने तिचा गळा दाबला.
मागच्या सीटवर निक्कीचा मृतदेह ठेवून साहिलने दिल्लीत जवळपास ४० किलोमीटर गाडी चालवली. दुसऱ्या दिवशी त्याने आपल्या कुटुंबाने पसंत केलेल्या मुलीशी लग्न केले. परंतु, मी माझ्या मैत्रिणीची हत्या केली आहे, असं साहिलने दुसऱ्याच दिवशी आपल्या बायकोला सांगितल्याचंही बोललं जातं. तू माहेरी निघून जा, असं त्याने सुचवल्यामुळे साहिलला अटक होण्यापूर्वीच ती परत गेली.
शिंदे-फडणवीसांनी ज्याचा आधार घेतला, त्यावरच पहिला घाव, ठाकरेंच्या वकिलाने टेन्शन वाढवलं