: सरकारी जमिनीवर लागवड केलेले सोयाबीनचे पीक जेसीबीच्या साह्याने उद्ध्वस्त करणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना रोखण्यासाठी महिला शेतकऱ्यानं शेतातच स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली. सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. प्रशासनातील अधिकारी कारवाई करण्यासाठी गेले असता, शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. तर कारवाई रोखण्यासाठी एका महिला शेतकऱ्याने स्वतःला पेटवून घेतले.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर या घटनेवरून राजकारण सुरू झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवास येथील अतवास येथे महिला शेतकऱ्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. महिला शेतकरी आणि तिच्या कुटुंबीयांनी अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या सरकारी अधिकाऱ्यांवर दगडफेक केली. त्यानंतर महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांवर दगडफेक करणाऱ्या ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांवर महिलेनं आरोप केले आहेत. नाला असल्याचे सांगून आमच्या शेतातील उभ्या पीकावर जेसीबी फिरवण्यात येत होता. विनंती करूनही अधिकारी थांबले नाहीत. त्यामुळे आत्मदहनाचा प्रयत्न केला, असे महिलेने सांगितले. सतवास पोलिसांच्या माहितीनुसार, किशोर चावरे आणि त्यांचे सहकारी अतिक्रमण हटवण्यासाठी गेले होते. महिलेने आणि तिच्या पतीने अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शेताजवळच्या नाल्यावरही अतिक्रमण केलं होतं. तेथे कारवाईसाठी गेले असता, महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी दगडफेक केली. तर अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकाने शेतातील सोयाबीनच्या पिकावर जेसीबी फिरवण्यास सुरुवात केली, असे महिलेचे म्हणणे आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

4 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

  2. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here