कानपूर: उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एका फ्लॅटमध्ये प्रेमी युगुलाचा मृतदेह सापडला आहे. दोघांचे मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आले. मृत तरुणीच्या हातात चुडा, कपाळावर कुंकू, टिकली, ओठांवर लिपस्टिक होती. तरुणीचं लग्न झालेलं नव्हतं. २६ फेब्रुवारीला तिची वरात येणार होती. तर मृत तरुण विवाहित होता. त्याला दीड वर्षांचा मुलगादेखील आहे. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यानंतर मृतदेह दोघांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले. कुटुंबीयांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

दोघांमध्ये कित्येक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांना लग्न करायचं होतं. मात्र लग्न होऊ शकलं नाही. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. आत्महत्येआधी तरुणानं तरुणीच्या कपाळावर कुंकू लावलं असावं, अशी शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली. पनकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. परिसरात वास्तव्यास असलेला मोहन सिंह आणि बीएससीची विद्यार्थिनी आरजू यांच्यात अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांना लग्न करायचं होतं. मात्र कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला.
VIDEO: टोल कर्मचारी जेवता जेवता कोसळला, उताणी पडला; अवघ्या २ सेकंदांत सगळंच संपलं
मोहनचं लग्न केल्यावर त्याचं मन संसारात रमेल आणि आरजूला विसरेल, असा विचार करून त्याच्या कुटुंबीयांनी ३ वर्षांपूर्वी त्याचं लग्न लावलं. लग्नानंतर मोहनला एक मुलगा झाला. मात्र याचा कोणताच परिणाम मोहन आणि आरजूच्या नात्यावर झाला नाही. दोघे संपर्कात होते. त्यांचे प्रेमसंबंधही कायम होते. मोहनच्या पत्नीला याला विरोध होता. यावरून दोघांमध्ये सातत्यानं वाद व्हायचे. दीड वर्षांपूर्वी मोहनची पत्नी मुलाला घेऊन माहेरी निघून गेली. पत्नी माहेरी गेल्यानंतर मोहन आणि आरजूच्या भेटीगाठी वाढू लागल्या.

मोहन आणि आरजूचा संपर्क वाढल्यानं कुटुंबीय चिंतेत होतं. मोहनला त्यांच्याकडून सतत बोलणी खावी लागायची. त्यामुळे मोहननं घर सोडलं आणि पनकी परिसरात एक फ्लॅट भाड्यानं घेतला. आरजू अनेकदा या फ्लॅटवर यायची. यानंतर आरजूच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न ठरवलं. २६ फेब्रुवारीला वरात येणार होती. आरजूच्या घरात लग्नाची तयारी सुरू झाली. मात्र आरजू मोहनला विसरायला तयार नव्हती. त्यामुळे १६ फेब्रुवारीला ती मामाच्या घरी जात असल्याचं सांगून मोहनला भेटायला गेली.
हा टॅटू कोणाचा? नव्या नवरीला प्रश्न केला, पतीचा जीव गेला; निष्प्राण देह दोन दिवस पेटत होता
मोहनचे कुटुंबीय दिवसभर त्याला फोन करत होते. मात्र त्यानं उत्तर दिलं नाही. कुटुंबीयांनी त्याच्या फ्लॅटवर जाऊन दार ठोठावलं. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पनकी पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. पोलीस फ्लॅटवर पोहोचले, तेव्हा दार आतून बंद होतं. पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश केला. तेव्हा त्यांना मोहन आणि आरजूचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here