जुन्नर ( पुणे): जुन्नर तालुक्यातील येडगाव धरणाच्या जलाशयात फिरण्यासाठी आलेल्या कुटुंबातील एका पाच वर्षांच्या मुलाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मुलाला खांद्यावर घेऊन पाण्यात उतरल्याने पाय घसरून मुलगा पाण्यात बुडाला. अंत्यत दुर्देवी अशी घटना घडल्याने जुन्नर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

इशान आखिल कढी ( वय ५. रा. अल्फा बिल्डींग, मेघविहान सोसायटी, पंढरीनगर, हांडेवाडी चौक, पुणे) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
महाराजांसाठी कायपण! पुण्यातील ‘या’ गावात रोज होते छत्रपती शिवरायांची आरती; अख्ख्या गाव जमतो
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे डॉ. राजेंद्र शामराव धांडे यांच्यासमवेत पुणे येथील अखिल भरतकुमार कढी व त्यांचे तीन मित्र सहकुटुंब शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास येडगाव धरण जलाशयाजवळ फिरण्यासाठी गेले होते. दुपारी जेवण झाल्यानंतर अखिल कढी हे त्यांचा मुलगा इशान याला खांद्यावर घेऊन पाण्यात उतरले. मात्र अखिल यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाय खडकावरून घसरला आणि ते पाण्यात पडले. मात्र त्यांच्या खांद्यावर असणारा ईशान पाण्यात वाहत गेला. खोल पाण्यात गेल्याने सर्वांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मात्र ईशान सापडला नाही. मात्र काही वेळाने या भागात काम करत असलेल्या तरुणांनी पाण्यात जाऊन शोधाशोध सुरू केली. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर ईशानला पाण्यातून बाहेर काढले.

पिकाची राखण करायला शेतात गेला, मात्र मध्यरात्री घडलं असं काही की शेतकऱ्याने गमावला जीव
त्याला तातडीने नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. फिरायला येताना त्यांनी धरण प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे. या घटनेने शोककळा पसरली असून फिरायला येताना काळजी घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अधिक तपास नारायणगाव पोलिस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here