मुंबई : टीम इंडियाने नागपूरपाठोपाठ दिल्ली कसोटी जिंकून पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाला जबर हादरा दिला आहे. जाडेजा-अश्विनच्या अभूतपूर्व कामगिरीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलिया संघाला ६ विकेट्सने पराभवाची धूळ चारली आहे. यादरम्यान, रनमशिन विराट कोहलीने आपल्या नावे एक मोठा रेकॉर्ड केलाय, जो रेकॉर्ड करणं एम एस धोनी, सौरव गांगुली यांच्यासारख्या दिग्गजांनाही जमलं नाहीये.

विराट कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५००० धावा पूर्ण केल्या आहेत. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अशी मोठी कामगिरी करणारा तो सचिन तेंडुलकरनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. पण सचिनला ही कामगिरी करण्यासाठी ५७७ सामने खेळावे लागले होते. तर विराटने ५४९ सामन्यांत २५ हजार धावा करण्याचा विक्रम केला. सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये हा विक्रम करणारा विराट कोहली पहिलाच फलंदाज आहे.

त्याचवेळी, २५००० धावांचा आकडा ५०+ च्या सरासरीने गाठणारा विराट जगातील पहिला खेळाडू आहे. विराट आणि सचिनपाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंग (५८८), आफ्रिकेच्या जॅक कॅलिस (५९४), श्रीलंकेच्या कुमार संगकारा (६०८) आणि महेला जयवर्धने (७०१) सामन्यात २५ हजार धावांचा पल्ला गाठला होता आहेत. या दिग्गजांच्या पंक्तीत विराट कोहली जाऊन बसलाय. केवळ ५४९ सामन्यांत २५ धावा करण्याचा विक्रम विराटने आपल्या नावे केलाय.

विदर्भाची लेक RCB संघात, लाखोंची बोली, दिशा कासटला आभाळ ठेंगणं!
नागपूरप्रमाणेच भारताने दिल्ली कसोटीही अवघ्या ३ दिवसांत जिंकली. भारताला जिंकण्यासाठी ११५धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे टीम इंडियाने ४ विकेट्स गमावून पूर्ण केले. चेतेश्वर पुजाराने आपली १०० वी कसोटी संस्मरणीय केली. त्याने नाबाद ३१ धावा केल्या. या विजयासह भारताने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

रोहित पवारांना ‘पॉवर’ मिळाली, MCA अध्यक्षपदानंतर आणखी एक महत्वाची जबाबदारी
कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या डावात २० चेंडूत तडकाफडकी ३१ धावा केल्या. पुजारासाठी रोहित धावबाद झाला. केएल राहुल केवळ एक धाव काढून तंबूत परतला. रविवारी तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात केवळ ११३ धावाच करू शकला. त्यामुळे भारताला केवळ ११५ धावांचे लक्ष्य मिळाले. कांगारू संघाला पहिल्या डावात एक धावांची आघाडी मिळाली. डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजाने कांगारुंची बोलती बंद करत ७ बळी घेतले. त्याला ऑफस्पिनर आर अश्विननेही चांगली साथ देत ३ बळी टिपले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here