वाचा:
कवठे महांकाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेखा अनिल माने या कुटुंबासह रांजणी येथे माहेरी राहण्यास आहेत. गेल्यावर्षी रेखा माने यांच्या भावाच्या पत्नीस याने अनैतिक संबंधातून पळवून नेले होते. या कारणावरून त्यांचा अल्पवयीन मुलगा अजय आणि त्यांचा भाऊ शशिकांत यांचा अमोल पवार सोबत वाद झाला होता. वादानंतर अमोल हा रांजणी गावातून निघून गेला होता. परंतु, करोना संसर्गामुळे एक महिन्यांपूर्वीच अमोल रांजणीत आला होता. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पुन्हा या तिघांचा जोरदार वाद झाला. यानंतर अजय याला जिवंत सोडत नाही, अशी धमकी अमोल पवार याने दिली होती.
वाचा:
अमोलने मित्राच्या मदतीने अजयला मारण्याचा कट रचला. बुधवारी रात्री त्यांनी अजयला फोन करून बोलवून घेतले. रात्री उशिरापर्यंत अजय घरी परत न आल्याने नातेवाईकांना शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. दरम्यान, गुरुवारी सकाळी अलकूड (एस) गावाच्या हद्दीत लंगरपेठ रस्त्यावरील टेंभू योजनेच्या कॅनॉलमध्ये अजयचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घऊन चौकशी केली असता हा खून अनैतिक संबंधातून झाल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने संशयित अमोल पवार आणि अनिल जाधव यांना अटक केली. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून, पुढील तपास सुरू आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
I really like and appreciate your blog post.
Thanks so much for the blog post.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.