पहिला कर्णधार
२००८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात एमएस धोनीने प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व केले. भारताने हा सामना ८ विकेटने जिंकला. यानंतर धोनीने २००८ मध्येच भारताला ऑस्ट्रेलियावर दोन कसोटी विजय मिळवून दिले होते. त्यानंतर डिसेंबर २००८ मध्ये चेन्नईमध्ये भारताने इंग्लंडचा ६ विकेट्सने पराभव केला. अशाप्रकारे, एमएस धोनीच्या नावावर पहिल्या चार कसोटींमध्ये सलग विजय मिळवण्याचा विक्रम होता. आता हा विक्रम भारताचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माच्या नावे झाला आहे.
दुसरा कर्णधार
दुसरीकडे, बाबर आझमने पाकिस्तानचे नेतृत्त्व करत असतानाच त्याच्या संघाला दक्षिण आफ्रिकेवर २-० असा विजय मिळवून दिला. यानंतर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानने २ सामन्यांच्या मालिकेत झिम्बाब्वेचा २-० असा क्लीन स्वीप केला. अशाप्रकारे बाबर आझम हा त्याच्या नेतृत्वाखाली पहिले चार सामने जिंकणारा पाकिस्तानचा पहिला आणि जगातील दुसरा कर्णधार ठरला.
नव्या विक्रमाची संधी
रोहित शर्मा आता इंदूरच्या होळकर स्टेडियमवर १ मार्चपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करेल. या सामन्यासोबत रोहित शर्माकडे कर्णधार म्हणून नवा विक्रम आपल्या नवे करण्याची संधी आहे. रोहित शर्माने या तिसऱ्या कसोटीत भारताला विजय मिळवून दिला तर तो धोनी आणि बाबर आझमचा विक्रम मोडीत काढू शकतो. कसोटी कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्माने फलंदाज म्हणूनही चांगली कामगिरी केली आहे. या उजव्या हाताच्या फलंदाजाने चार कसोटीत ४५.५० च्या सरासरीने २७३ धावा केल्या. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२३ मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत त्याची सर्वोत्तम धावसंख्या १२० होती.