२३ सप्टेंबर २०१६ रोजी जिऊतिया (उत्तर भारतीय सण) या दिवशी १६ वर्षांचा आकाश हा दाहा नदीत आंघोळ करत होता. यावेळी पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. आकाशच्या मृत्यूसमयी त्याची धाकटी बहीण निशू अवघ्या दहा वर्षांची होती. दादाच्या मृत्यूचा तिच्या मनावर गंभीर परिणाम झाला.
आकाश आणि निशू यांचं प्रेमाचं नातं होतं. दादाच्या मृत्यूनंतर ती सारखी नदीच्या दिशेने धावत जायची. ‘मला दादा बोलवतोय’ असं ती म्हणायची. वडिलांनी तिला डॉक्टरांकडे उपचारासाठी नेलं. त्यानंतर तिचं मानसिक आरोग्य काहीसं सुधारलं. मात्र सहा वर्षांनी त्याच ठिकाणी तिने जीवाचं बरं वाईट करुन घेतलं.
महाशिवरात्री निमित्त शिव मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी शनिवारी सकाळी कुटुंबातील सर्व सदस्य गेले होते. घरी निशूचे काका होते. निशू लहान मुलांसोबत खेळत होती. रविवारी सकाळी आठ वाजता ती घरातून बाहेर पडली. मंदिरातून परतल्यावर कुटुंबीयांनी निशूचा शोध सुरु केला. रात्रभर शोधाशोध करुही ती कुठेच सापडली नाही.
बलभद्र पटी गावातील मच्छिमार मासे पकडण्यासाठी दाहा नदीत गेले, तेव्हा त्यांनी तरुणीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना पाहिला. वयाच्या १६ व्याच वर्षी दोन्ही भावंडांचा मृत्यू झाला. एकाच ठिकाणी दोघा भावंडांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र आश्चर्य आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
राळेगणसिद्धी गहिवरले! शहीद कॅप्टन सौरभ औटी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार