त्याचवेळी सीएम गहलोत यांनी आपल्या पक्षाच्या बंडखोर आमदारांकडे लक्ष वेधले. जर कोणाला राग आला असेल तर त्यांनी पक्षाची हाय कमांड AICC शी चर्चा करावी किंवा राज्य कॉंग्रेस समितीकडे यावे. तुम्ही सर्व कॉंग्रेसच्या निशाणीवर निवडून आला आहात. यामुळे तुम्ही सरकारसोबत यावं, असं आवाहन गहलोत यांनी केलं.
विधानसभा अधिवेशनाची तारीख निश्चित झाल्यानंतर आमदारांच्या घोडेबाजारातील रेट वाढला आहे. हा रेट अनलिमिटेड झाला आहे. ज्यांनी पहिला हप्ता घेतलेला नाही त्यांनी परत यावं. भाजप नेते लपून छपून दिल्लीला जात आहे. देव त्यांना सद्बुद्धी देवो, असं गहलोत म्हणाले.
विधानसभेसाठी १४ तारख निश्चित होताच आमदारांचा पहिला हप्ता १० होता. दुसरा हप्ता १५ होता. हे जाणून चकित व्हाल, आता ते अनलिमिटेड झाले आहे. काय हवं तुम्हाला? तुम्हीच सांगा असं आता आमदारांना विचारलं जात आहे. याचा अर्थ असा की घोडे व्यापाराचा रेट २५ वरून वाढला आहे. याचे मॉनिटरिंग कोण करतंय हे सर्वांनाच ठाऊक आहे, असा आरोप गहलोत यांनी सचिन पायलट यांचे नाव न घेता केला.
सरकार पाडण्याच्या या षडयंत्रात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांचे नाव समो आले आहे. परंतु अद्याप त्यांनी राजीनामा दिलेला नाही. कॉंग्रेसच्या राज्यात असं काम करणारे मंत्री राजीनामा देत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपण संपूर्ण घटनाक्रमाची माहिती करून दिली आहे, असं गहलोत यांनी सांगितलं.
अधिवेशनात काय होईल ते सल्लागार समिती ठरवेल. बसपाच्या आमदारांविषयीही गहलोत यांनी मायावतींचा आरोप फेटाळून लावला. काहीही परिस्थइती निर्माण होऊ दे आपण ताणतणावात राहत नाही. आपल्यावर देवाची कृपा आहे. परिस्थिती काहीही असो आपण सत्यतेनेच वागतो, असं मुख्यंमत्री अशोक गहलोत म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
Thank you ever so for you article post.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! Thank you for publishing this awesome article.