‘भारतासारख्या १३८ कोटी लोकसंख्येच्या देशात करोनाची अर्थात ” () विकसित होणे हा धोरणी पर्याय ठरूच शकत नाही. सामूहिक रोगप्रतिकारशक्तीच्या निष्पत्तीची किंमत अतिशय मोठी असू शकते,’ असे मत गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव यांनी व्यक्त केले.
‘सामूहिक रोगप्रतिकारशक्ती हे करोनासारख्या संसर्गजन्य रोगापासून लोकसंख्येला लाभणारे एकप्रकारचे अप्रत्यक्ष संरक्षण असते. पण, लोकसंख्येची लशीच्या माध्यमातून किंवा आधीच्या संसर्गातून प्रतिकारशक्ती वाढली, तरच सामूहिक रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. आधी संसर्ग होऊन त्यातून बरे होण्याच्या माध्यमातून सामूहिक रोगप्रतिकारशक्ती विकसित करणे, हे धोरण भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशाला परवडणारे नाही. ढोबळमानाने १३८ कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात लशीशिवाय सामूहिक रोगप्रतिकारशक्ती विकसित करणे हा पर्याय ठरू शकत नाही. कारण अशा सामूहिक रोगप्रतिकारशक्तीचा अर्थ देशातील कोट्यवधी लोक आजारी पडतील, रुग्णालयांमध्ये जातील आणि आरोग्यव्यवस्था कोलमडून असंख्य रुग्ण मृत्युमुखी पडतील, असा होतो. सामूहिक रोगप्रतिकारशक्ती भारतात अजून दूरच आहे. करोना रोखण्यासाठी आपल्याला मास्क, सुरक्षित वावर, सार्वजनिक स्थळी गर्दी न करणे, हात स्वच्छ धुवत राहण्यासारख्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना करोनावरील प्रभावी लस विकसित होईपर्यंत करत राहाव्या लागतील,’ असे भूषण यांनी स्पष्ट केले.
लस उत्पादनात भारताची भूमिका महत्त्वाची
जगात करोनावरील २४ लशी वैद्यकीय मूल्यांकनाच्या टप्प्यात, म्हणजे चाचण्यांच्या टप्प्यात आहे. १४१ लशी वैद्यकीय पूर्व मूल्यांकनाच्या म्हणजे संशोधनाच्या किंवा प्राण्यांवरील प्रयोगाच्या टप्प्यात आहेत. त्यापैकी अमेरिका, ब्रिटन आणि चीनमधील तीन लशी वैद्यकीय चाचण्यांच्या अंतिम टप्प्यात असून, त्यांच्या चाचण्या यशस्वी झाल्यास त्यांना आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळवून उत्पादन सुरू करता येईल. जगात कुठेही करोनावरील लस विकसित झाल्यास तिच्या व्यापक प्रमाणातील उत्पादनात भारताची महत्त्वाची भूमिका असेल. जागतिक आरोग्य संघटनेसोबत ” आणि ” या दोन आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारत आघाडीच्या भूमिकेत असून, या संस्थांच्या माध्यमातून विविध देशांची लशींची गरज आणि उत्पादक देशांची उत्पादन क्षमता यांचा मेळ साधून उत्पादन व वितरण केले जाईल तसेच, एखाद्या देशाला लस विकसित करणाऱ्या देशाशी वैयक्तिक करार करूनही लस मिळविता येईल, असे भूषण यांनी सांगितले.
वाचा :
वाचा :
करोनामुक्तांचा आकडा दहा लाखांवर
भारतात झालेल्या रुग्णांनी गुरुवारी दहा लाखांचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. दोन महिन्यांत करोनामुक्तांची संख्या एक लाखावरून दहा लाखांवर गेली आहे. ४ जूनला एक लाख ३०३ रुग्ण, २५ जून रोजी तीन लाख ४७ हजार ९७८ रुग्ण आणि ३० जुलै रोजी १० लाख २० हजार ५८२ रुग्ण करोनामुक्त झाले. भारतातील डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्यसेवेत गुंतलेल्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र केलेल्या परिश्रमाची ही पावती असल्याचे या आकड्यावरून स्पष्ट होते. भारतासारख्या मर्यादित साधने असलेल्या सार्वजनिक आरोग्यसेवेने केलेल्या परिश्रमातून दहा लाखांहून अधिक रुग्णांचे जीव वाचले, असे भूषण म्हणाले. भारतात आतापर्यंत १५ लाख ८३ हजार ७९२ करोनारुग्णांची नोंद झाली असून, त्यातील १० लाख २० हजार ५८२ रुग्ण करोनामुक्त झाले, ही जमेची बाजू असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
बरे होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात ६० टक्क्यांवर
राज्यात करोनाचे गुरुवारी आठ हजार ८६० रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या दोन लाख ४८ हजार ६१५ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.३७ टक्के आहे. गुरुवारी ११ हजार १४७ नव्या रुग्णांचे निदान झाले असून, सध्या एक लाख ४८ हजार १५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. गेल्या २४ तासांत राज्यात २६६ रुग्णांचा मृत्यू झाला.
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times